शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे नागरिकांना धोका; अन्न व औषध प्रशासनाचे नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 23:42 IST

वसईत विभागाचे कार्यालयच नाही

विरार : वसई - विरारमध्ये भेसळखोरांनी आपले बस्तान मांडले असून खाद्यपदार्थांत भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरू आहे. असे असतानाही अन्न तसेच औषध प्रशासन अथवा महापालिका आरोग्य विभाग याबाबत गंभीर नाही. बनावट मावा, रासायनिक पद्धतीने फळे पिकवणे, घाणीच्या विळख्यात खाद्यपदार्थ अनेक कारखाने सुरु आहे. विशेष म्हणजे वसईत अन्न व औषध विभागाचे कार्यालय नाही. यामुळे नागरिकांनी तक्र ार करायची कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

वसई तालुक्यातील नालासोपारा येथे चक्क घाणीच्या साम्राज्यात खाकरा बनविणारे शेकडो कारखाने कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे सारेच नियम धाब्यावर बसवून घाणीच्या विळख्यात वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे बनवून मुंबई, ठाणे, पालघर येथे विक्री केले जात आहेत. मात्र या कारखान्यांवर आजतयागत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.

खाकरा बनवणारे शेकडो कारखाने मोरगाव, नागीनदास, अलकापुरी, संतोष भुवन परिसरात बिनधास्त सुरु आहेत. त्यातील बहुतांश कंपनीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे कोणतेही परवाने नाहीत. तसेच या कारखान्यांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून कधीच पाहणी केली जात नाही. यामुळे घाणीच्या साम्राज्यात हे लघुउद्योग उभे राहत आहेत.

या कंपनीत रोजंदारीवर महिलांद्वारे वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे बनविले जातात. आणि कोणत्याही कंपनीच्या नावाने सीलबंद करून मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरात वितरित केले जातात. विशेष बाब म्हणजे काही मोठे फरसाणवाले सुद्धा या कंपनीकडून आपले खाकरे बनवून केवळ आपल्या नावाचे पॅकिंग करून सर्रास गुणवंत पदार्थ म्हणून विकतात.मनुष्य बळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी पाहणी करणे शक्य नाही. तक्र ारी आल्यास आम्ही कारवाई करतो. शासनाने मनुष्यबळ वाढविल्यास भेसळखोरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. नागरिकांनी असे पदार्थ घेतना सावधानता बाळगावी. - पी.एन. वाघमारे, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी, ठाणे

टॅग्स :FDAएफडीए