शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धोकादायक इमारत पाडताना काही भाग पडून लगतच्या तीन घरांचे नुकसान; प्रदूषण नियंत्रणाची ऐशी तैशी 

By धीरज परब | Updated: March 8, 2024 19:54 IST

भाईंदर पश्चिम भागातील एक जुनी धोकादायक ठरवलेली इमारत पाडताना लगतच्या झोपडपट्टीतील तीन घरांवर इमारतीचा काही भाग कोसळून नुकसान झाले.

मीरारोड- भाईंदर पश्चिम भागातील एक जुनी धोकादायक ठरवलेली इमारत पाडताना लगतच्या झोपडपट्टीतील तीन घरांवर इमारतीचा काही भाग कोसळून नुकसान झाले. इमारत पाडताना आवश्यक सुरक्षा उपाय केले नाहीतच शिवाय धुळीचे प्रदूषण होऊ नये म्हणून देखील पालिका निर्देशांचे उल्लंघन केल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले. भाईंदर पश्चिमेस सेकंडरी शाळेच्या समोर आनंद लक्ष्मी हि ४ मजली इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे. पालिकेने सदर इमारतीला नोटीस सुद्धा बजावली होती. इमारतीच्या गृह निर्माण संस्थे कडून सदर इमारत पाडण्याचे काम शनिवारी सुरु होते. 

पोकलेनच्या सहाय्याने इमारत तोडताना काही भाग कोसळून लगतच्या नेहरू नगर मधील तीन बैठ्या घरांवर पडला. त्यात घरांच्या भिंतींना तडे गेले पण त्यावेळी घरात कोणी नसल्याने कोणती जीवित हानी झाली नसल्याचे रहिवाश्यानी सांगितले. सुरक्षेचे कोणतेच आवश्यक उपाय न करता अश्या पद्धतीने इमारत पाडताना दुर्घटना घडल्या बद्दल रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला. जुनी जीर्ण इमारत आणि आजूबाजूला घरे असल्याने नियंत्रित पद्धतीने इमारत तोडणे आवश्यक होते असे त्यांनी बोलून दाखवले. 

दरम्यान, पाडकाम करताना डेब्रिसची मानवी आरोग्याला घातक अशी धूळ हवेत पसरू नये म्हणून सर्व बाजूनी ग्रीन मॅट सह आवश्यक उपाययोजना प्रदूषण रोखण्यासाठी करणे आवश्यक होते. शासनापासून पालिकेने देखील त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जरी केलेल्या होत्या. परंतु त्या कडे देखील डोळेझाक करण्यात आल्याने सर्वत्र धुळीचे साम्रज्य पसरून लोकांना श्वास घेणे सुद्धा काहीकाळ अवघड झाले होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड