शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या बाडापोखरण नळपाणी योजनेचे काम संथ

By admin | Updated: March 31, 2017 05:33 IST

माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात मंजूर

शौकत शेख / डहाणूमाजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या ४३ कोटींच्या बाडापोखरण नळ योजनेच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक महीन्यांपासून संथगतीने सुरु असल्याबद्दल पंचायत समितीने बोलविलेल्या बैठकीत नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप विभागीय अभियंता एस.एन.कसबे यांना चांगलेच धारेवर धरु न या योजनेचे काम मुदतवाढ देउनही का पूर्ण होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी केला.यावेळी पंचायत समिति सभापती चंद्रिका अंबात जिल्हा परिषद सदस्या व सभापती विनीता कोरे, पंचायत समिती सदस्य अमिता पाटील,निकिता चूरी,पंचायत समिती सदस्य वशीदास अंभिरे, चिंचणीचे सरपंच सुरेंद्र करवीर,वासगावचे सरपंच सतीश पाटील डहाणू पाणीपुरवठा विभागाचे उपअभीयंता आर.ए.पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.डहाणूच्या पश्चिम किनार पट्टीवरील २९ गावांना व ४ पाड्याना पुरेसे पाणी मिळावे या हेतूने मागील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने २००६ ला कालबाह्य झालेल्या बाडापोखरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला होता. परंतु या योजनेचे काम ठरलेल्या मुदतीत न झाल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. येथील लोकांना या योजनेच्या अपुऱ्या पाण्यामुळे पंधरा पंधरा दिवस पाणी साठवून ते पिण्याची वेळ आली आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे दरम्यान बुधवार रोजी पाणीपुरवठा उपअभियंता(डहाणू) यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित सरपंच उपसरपंचांनी व ग्रामस्थानी रौद्रवतार धारण केला. उप विभागीय अभियंता एस.एन.कसबे निरुत्तर झाल्याने लोकांचा रोष आधिकच वाढला काम निकृष्ट, वंचित पाड्यांच्या समावेशाची मागणीविशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या बाडापोखरण योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम निकृष्ट होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी गळती होत असल्याचे स्थानिकांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या योजनेतून वंचित राहिलेल्या पाड्यांचाही तिच्यात समाविष्ट करण्याची मागणी सरपंच सुरेंद्र करवीर यांनी केली.