शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

डहाणूच्या बाडापोखरण नळपाणी योजनेचे काम संथ

By admin | Updated: March 31, 2017 05:33 IST

माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात मंजूर

शौकत शेख / डहाणूमाजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या ४३ कोटींच्या बाडापोखरण नळ योजनेच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक महीन्यांपासून संथगतीने सुरु असल्याबद्दल पंचायत समितीने बोलविलेल्या बैठकीत नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप विभागीय अभियंता एस.एन.कसबे यांना चांगलेच धारेवर धरु न या योजनेचे काम मुदतवाढ देउनही का पूर्ण होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी केला.यावेळी पंचायत समिति सभापती चंद्रिका अंबात जिल्हा परिषद सदस्या व सभापती विनीता कोरे, पंचायत समिती सदस्य अमिता पाटील,निकिता चूरी,पंचायत समिती सदस्य वशीदास अंभिरे, चिंचणीचे सरपंच सुरेंद्र करवीर,वासगावचे सरपंच सतीश पाटील डहाणू पाणीपुरवठा विभागाचे उपअभीयंता आर.ए.पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.डहाणूच्या पश्चिम किनार पट्टीवरील २९ गावांना व ४ पाड्याना पुरेसे पाणी मिळावे या हेतूने मागील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने २००६ ला कालबाह्य झालेल्या बाडापोखरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला होता. परंतु या योजनेचे काम ठरलेल्या मुदतीत न झाल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. येथील लोकांना या योजनेच्या अपुऱ्या पाण्यामुळे पंधरा पंधरा दिवस पाणी साठवून ते पिण्याची वेळ आली आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे दरम्यान बुधवार रोजी पाणीपुरवठा उपअभियंता(डहाणू) यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित सरपंच उपसरपंचांनी व ग्रामस्थानी रौद्रवतार धारण केला. उप विभागीय अभियंता एस.एन.कसबे निरुत्तर झाल्याने लोकांचा रोष आधिकच वाढला काम निकृष्ट, वंचित पाड्यांच्या समावेशाची मागणीविशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या बाडापोखरण योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम निकृष्ट होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी गळती होत असल्याचे स्थानिकांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या योजनेतून वंचित राहिलेल्या पाड्यांचाही तिच्यात समाविष्ट करण्याची मागणी सरपंच सुरेंद्र करवीर यांनी केली.