शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

वादळामुळे डहाणूतील ५२९ कुटुंबे उघड्यावर; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाठवले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:00 IST

तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.

डहाणू : तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.घरांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र मदतीसाठी अद्याप शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याने आपत्तीग्रस्त कुटुंबांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे. पावन येथिल शाळेची पडझड झाली असून हजारो हेक्टर भातशेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असुन शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सात दिवसांपासून गावात अंधारवादळामुळे वीजेचे खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज वाहिन्या नादुरु स्त झाल्या आहेत. त्यामुळे धरमपुर, बापूगाव, बांधघर, निंबापूर, गांगोडी शेनसरी, सायवन, किन्हवली, दाभाडी दह्याळे वेहाळी रामपूर आदी दहा गावात शुक्र वारपासून तब्बल ७ दिवसापासुन वीज नसल्याने गावकºयांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.डहाणूत निर्माण झालेल्या आपत्तीमुळे झाडे उन्मळुन तसेच वीज खांब कोलमडल्याने वीज वाहीन्याचे कनेक्शन तुटले आहेत. वीजे अभावी पाण्याची सोय नसल्याने बापुगाव आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर ओढवली आहे.पाच दिवसापासुन वीज नसल्याने वीज कंपनीबाबात ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार