शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

डहाणूत पाणथळ जमिनीवर घातला भराव

By admin | Updated: June 4, 2016 01:12 IST

डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. समुद्र अधिनियम कायदा पायदळी तुडवून नैसिर्गक जलयुक्त शिवारं बुजविली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारा हा प्रकार रोखणारी डहाणूतील प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ ठरल्याने आगामी काळात या गावांमध्ये पाणीटंचाई, शेती आणि पर्यावरण आदि. प्रश्न बिकट बनणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. हॉटेल व्यवसाय आणि सेकंड होमच्या शहरी मानिसकतेमुळे समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. डहाणू तालुक्यातील नरपड, चिखले, घोलवड या समुद्रकिनारी गावातील आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखबून, त्यांच्याकडील शेत जमिनी खरेदी करून धनदांडग्यांना विकणाऱ्या दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाच्याकडेला असलेल्या पाणथळ जमिनी उच्चतम भरती रेषेपासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर आहेत. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे जून ते डिसेंबर या कलावधीत पावसाचे पाणी साठत असल्याने जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढण्यासह, क्षारतेचे प्रमाण घटण्यास मदत होते. विविध पाणथळ वनस्पती व पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे इ. वास्तव्यामुळे परिसर जैव विविधतेने नटल्याने परिसंस्था बळकट बनली आहे. भात उत्पादनाकरीता हा भाग पोषक असल्याने स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागतो. लोकांचे दैनंदिन जीवन स्थानिक जैव संस्कृती मध्ये भिनलेले असते. त्यामुळे नैसिर्गक जलयुक्त शिवरांवर भात शेतीसह शेत तळ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती, कोळंबी प्रकल्प आदींकरिता स्थंनिकांना प्रेरित करणे अपेक्षित आहे. दरम्यान दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास शासनाचा जलसंधारण आणि ग्रामविकास विभाग आग्रही आहे. (वार्ताहर)