शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

डहाणूत पाणथळ जमिनीवर घातला भराव

By admin | Updated: June 4, 2016 01:12 IST

डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. समुद्र अधिनियम कायदा पायदळी तुडवून नैसिर्गक जलयुक्त शिवारं बुजविली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारा हा प्रकार रोखणारी डहाणूतील प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ ठरल्याने आगामी काळात या गावांमध्ये पाणीटंचाई, शेती आणि पर्यावरण आदि. प्रश्न बिकट बनणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. हॉटेल व्यवसाय आणि सेकंड होमच्या शहरी मानिसकतेमुळे समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. डहाणू तालुक्यातील नरपड, चिखले, घोलवड या समुद्रकिनारी गावातील आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखबून, त्यांच्याकडील शेत जमिनी खरेदी करून धनदांडग्यांना विकणाऱ्या दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाच्याकडेला असलेल्या पाणथळ जमिनी उच्चतम भरती रेषेपासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर आहेत. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे जून ते डिसेंबर या कलावधीत पावसाचे पाणी साठत असल्याने जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढण्यासह, क्षारतेचे प्रमाण घटण्यास मदत होते. विविध पाणथळ वनस्पती व पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे इ. वास्तव्यामुळे परिसर जैव विविधतेने नटल्याने परिसंस्था बळकट बनली आहे. भात उत्पादनाकरीता हा भाग पोषक असल्याने स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागतो. लोकांचे दैनंदिन जीवन स्थानिक जैव संस्कृती मध्ये भिनलेले असते. त्यामुळे नैसिर्गक जलयुक्त शिवरांवर भात शेतीसह शेत तळ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती, कोळंबी प्रकल्प आदींकरिता स्थंनिकांना प्रेरित करणे अपेक्षित आहे. दरम्यान दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास शासनाचा जलसंधारण आणि ग्रामविकास विभाग आग्रही आहे. (वार्ताहर)