शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत पाणथळ जमिनीवर घातला भराव

By admin | Updated: June 4, 2016 01:12 IST

डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत पाणथळ जमिनीवर मातीचा भराव घालून बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. समुद्र अधिनियम कायदा पायदळी तुडवून नैसिर्गक जलयुक्त शिवारं बुजविली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारा हा प्रकार रोखणारी डहाणूतील प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ ठरल्याने आगामी काळात या गावांमध्ये पाणीटंचाई, शेती आणि पर्यावरण आदि. प्रश्न बिकट बनणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. हॉटेल व्यवसाय आणि सेकंड होमच्या शहरी मानिसकतेमुळे समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. डहाणू तालुक्यातील नरपड, चिखले, घोलवड या समुद्रकिनारी गावातील आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखबून, त्यांच्याकडील शेत जमिनी खरेदी करून धनदांडग्यांना विकणाऱ्या दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाच्याकडेला असलेल्या पाणथळ जमिनी उच्चतम भरती रेषेपासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर आहेत. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे जून ते डिसेंबर या कलावधीत पावसाचे पाणी साठत असल्याने जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढण्यासह, क्षारतेचे प्रमाण घटण्यास मदत होते. विविध पाणथळ वनस्पती व पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे इ. वास्तव्यामुळे परिसर जैव विविधतेने नटल्याने परिसंस्था बळकट बनली आहे. भात उत्पादनाकरीता हा भाग पोषक असल्याने स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागतो. लोकांचे दैनंदिन जीवन स्थानिक जैव संस्कृती मध्ये भिनलेले असते. त्यामुळे नैसिर्गक जलयुक्त शिवरांवर भात शेतीसह शेत तळ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती, कोळंबी प्रकल्प आदींकरिता स्थंनिकांना प्रेरित करणे अपेक्षित आहे. दरम्यान दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास शासनाचा जलसंधारण आणि ग्रामविकास विभाग आग्रही आहे. (वार्ताहर)