शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

डहाणू-विरार ५ वर्षांत ६१३ बळी, ट्रॅक ओलांडणे, दारातून पडणे बेतते जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:40 IST

डहाणू-विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या अपघातात ६१३ जणांचा बळी गेला आहे.

- हितेन नाईकपालघर : डहाणू-विरार दरम्यान रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या ५ वर्षात वेगवेगळ्या अपघातात ६१३ जणांचा बळी गेला आहे.वसई-विरारची लोकसंख्या वाढल्यामुळे इथला वर्ग पालघर, डहाणूकडे स्थलांतरीत होत आहे. पश्चिम रेल्वेने डहाणूपर्यंतच्या सेवेला उपनगरीय दर्जा दिला असला तरी गाड्यांच्या संख्येत पुरेशी वाढ न झाल्याने इथल्या प्रवाशांना आता ट्रेन च्या दरवाज्यात लटकून प्रवास करावा लागतो आहे. डहाणू-विरार दरम्यानच्या वाढत्या गर्दीमुळे हे अपघाती मृत्यू झाले असून हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही.गेली अनेक वर्षे येथील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना व येथील प्रशासन प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ घडवून आणण्याबाबत सतत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. इथल्या प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथे यानिमित्ताने होत आहे.मुंबईतील महागडी घरे परवडत नसल्याने सर्वसामान्यांनी वसई-विरारला पसंती देऊन स्वस्त घरासाठी तो पर्याय निवडला. मात्र येथेही घरांचे भाव वाढत चालल्याने तसेच गर्दी प्रचंड वाढल्याने नागरिकांनी स्वस्त घरासाठी पालघर, बोईसर, डहाणूची निवड केली.येथील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे रेल्वेमधील गर्दी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढू लागली. हा नागरीकरणाचा विस्तार येथील रेल्वे सेवांच्या मानाने मोठा असल्याने येथील अपघातात होणारे हे मृत्यू या मागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील बहुसंख्य बळी हे प्रवास करतांना खाली पडणे, लोहमार्ग ओलांडत असतांना धडक बसणे, दरवाजाला लोंबकळून प्रवास करतांना पोलचा फटका बसून खाली पडणे. अशी आहेत.ती दूर करण्यासाठी रेकची संख्या वाढविणे, त्यांच्या डब्यांची संख्या वाढविणे व पादचारी पुलांची संख्या आणि रुंदी वाढविणे सरकते जीने बसविणे आदी उपाय करण्याची आवश्यकता आहे.रेल्वेला पर्याय नसल्याने जीवावर उदारयेथील परिसरातील प्रवासी जात असताना रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी व रेटारेटी होते. प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. कारण त्यांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो.या मार्गावर वाढत असलेले प्रवासी व येथे या पाच वर्षात बळी गेल्याची आकडेवारी पाहता रेल्वे प्रशासनाने येथील लोकलची संख्या तसेच डबे वाढवावेत, तसेच लांब अंतराचा प्रवास करणाºयांना मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. येथील लोकल सेवा मुंबई प्रमाणे करून या मार्गावर दर ३० मिनिटाला एक लोकल सोडण्याची मागणीही रेल्वेकडे केली आहे.डहाणू ते विरार दरम्यान अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचेही जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१७ दरम्यान ६१३ प्रवाशांचा बळी गेल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वसई विरारचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार चोरघे यांनी याबाबतीत मागितलेल्या माहितीद्वारे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.1084पुरु षांचा बळी224महिलांचा बळी1,308जणांचा विविध कारणांनी मागीलदहा वर्षात सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान बळी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार