शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

डहाणू तालुक्यातील ९ वीचे प्रवेश धोक्यात

By admin | Updated: May 21, 2017 03:35 IST

या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे.

- शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पण आता आठवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना नववीत कुठे आणि कसा प्रवेश मिळवून द्यायचा हा प्रश्न पालकांना भेडसावतो आहे. तो वेळीच न सुटल्यास हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक फरपट होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पाच किमी परिसरात माध्यमिक शाळा असणे गरजेचे आहे. परंतु डहाणू या आदिवासीबहुल तालुक्यातील माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन तुकडी मंजूर नाही, बसायला जागा नाही अशी उत्तरे देऊन पालकांना पिटाळून लावत आहेत. त्यामुळे आपला पाल्य शिकला पाहिजे ही आशा उराशी बाळगून माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या गरीब, निरक्षर पालकांच्या पदरी निराशा पडत आहे.एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागलेली असतांना डहाणू, तलासरी सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांना नववीत प्रवेश मिळू नये ही महाराष्ट्रातील शिक्षणाची शोकांतिका आहे. या वर्षी आठवीत किती मुले उत्तीर्ण झाली व जिथे नववीची इयत्ता नाही अशा शाळांतील मुलांना कुठे आणि कसा प्रवेश द्यायचा याचे नियोजन माध्यमिक शिक्षण खात्याने केलेले नाही. हेच यावरून उघड झाले आहे. यामुळे ज्या शाळेत ही मुले आठवी उत्तीर्ण झाली त्याच शाळांना नववीचे वर्ग सुरू करायला लावणे योग्य ठरेल.पालक झाले संतप्तजर हा प्रश्न वेळीच सुटला नाही तर त्यासाठी मोर्चा काढण्याची सज्जता आदिवासी बांधवांनी केली आहे. मोर्चासाठी आमचा एक दिवसाचा रोजगार बुडाला तरी चालेल ते नुकसान आम्ही आमच्या लेकराबाळांसाठी सहन करू पण त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.आता माध्यमिक शिक्षण अधिकारी इतके दिवस झोपले होते का व आता ते कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.