शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

डहाणू-तलासरीतील भूकंप शासनाने गांभीर्याने घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 23:18 IST

तातडीने पुनर्वसन करावे : विनोद निकोले यांची पुनर्वसनमंत्र्यांकडे मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरीमध्ये सौम्य व तीव्र भूकंपाचे धक्के वारंवार बसत असून त्या अनुषंगाने शासनाने तत्काळ दखल घेऊन नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी व त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी भूकंप व पुनर्वसन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ. निकोले म्हणाले की, डहाणू, तलासरी, दापचरी, कवाडा, उधवा, वंकास, कासा अशा अनेक गावांतील घरांना भूकंपामुळे तडे गेले आहेत. वर्षभर सौम्य व मध्यम स्वरूपाचे शेकडो धक्के या परिसरात सातत्याने सुरूच आहेत. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भीषण भूकंपानंतर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यांत सुसूत्रता असणे किती महत्त्वाचे आहे हे प्रथमच अधोरेखित झाले आहे. किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली. तरी ही बाब विचारात घेऊन सध्या पालघरमध्ये होत असलेल्या भूकंपांची गंभीर दखल का घेतली जात नाही? डहाणू व तलासरी तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांवर मानसिक आघात केला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत.त्या अनुषंगाने भूकंप सतत का होत आहेत त्याचे संशोधन करण्यात यावे. भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत असून या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने संबंधित भागात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.एनडीआरएफ तुकडी तैनात करण्याची मागणीपालघर जिल्ह्यात बसणाºया भूकंपांच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, बाधित कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केली आहे. दरम्यान, निकोले यांनी डहाणूच्या वंकास खुबाळे, धुंदलवाडी, दापचरी इत्यादी गावागावात खेड्यापाड्यात भेट देऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली आहे. शिवाय या परिसरात एनडीआरएफ तुकडी तैनात करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार