शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

डहाणू-तलासरीतील भूकंप शासनाने गांभीर्याने घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 23:18 IST

तातडीने पुनर्वसन करावे : विनोद निकोले यांची पुनर्वसनमंत्र्यांकडे मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरीमध्ये सौम्य व तीव्र भूकंपाचे धक्के वारंवार बसत असून त्या अनुषंगाने शासनाने तत्काळ दखल घेऊन नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी व त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी भूकंप व पुनर्वसन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ. निकोले म्हणाले की, डहाणू, तलासरी, दापचरी, कवाडा, उधवा, वंकास, कासा अशा अनेक गावांतील घरांना भूकंपामुळे तडे गेले आहेत. वर्षभर सौम्य व मध्यम स्वरूपाचे शेकडो धक्के या परिसरात सातत्याने सुरूच आहेत. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भीषण भूकंपानंतर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यांत सुसूत्रता असणे किती महत्त्वाचे आहे हे प्रथमच अधोरेखित झाले आहे. किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली. तरी ही बाब विचारात घेऊन सध्या पालघरमध्ये होत असलेल्या भूकंपांची गंभीर दखल का घेतली जात नाही? डहाणू व तलासरी तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांवर मानसिक आघात केला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत.त्या अनुषंगाने भूकंप सतत का होत आहेत त्याचे संशोधन करण्यात यावे. भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत असून या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने संबंधित भागात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.एनडीआरएफ तुकडी तैनात करण्याची मागणीपालघर जिल्ह्यात बसणाºया भूकंपांच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, बाधित कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केली आहे. दरम्यान, निकोले यांनी डहाणूच्या वंकास खुबाळे, धुंदलवाडी, दापचरी इत्यादी गावागावात खेड्यापाड्यात भेट देऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली आहे. शिवाय या परिसरात एनडीआरएफ तुकडी तैनात करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार