शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:23 IST

मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे.

बोर्डी : मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे. दरम्यान संकरीत बियाण्यांच्या खरेदीतील फसवणुकीचा धोका टाळण्याकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ विभाग पडतात. त्यापैकी कोकण विभागामध्ये तीन विभाग येतात. कोकणाचे शेती व पीकपद्धती ठरविण्यामध्ये समुद्रकिनाºयापासूनचे अंतरसुद्धा महत्वाचे आहे. त्यानुसार किनाºयापासून १५ ते २० किमी खलाटी, २० ते ६० किमी वलाटी आणि त्यानंतर घाटमाथा असे हे तीन प्रकार आहेत. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, तालुक्याचा समावेश प्रामुख्याने खलाटी आणि वलाटी क्षेत्रात होतो. तालुक्यात खरीप हंगामात १५००० हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यामध्ये हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. डहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फक्त कर्जत ७ या ११५ ते १२० दिवसाच्या कालावधीच्या भात बियाण्यांचे वाटप केले जाते आहे. या हंगामात २०० क्विंटल साठा कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. २० किलोच्या पोत्याची किंमत ८५९ रु पये आहे. मात्र सवलतीच्या दरात ४२५ रु पये आकारले जातात. या करिता लाभार्थी शेतकºयांकडे ७/१२ उतारा आवश्यक आहे. जास्तीतजास्त शेतकºयांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार भात वाणाच्या अन्य जातींचे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र ते उपलब्ध नसल्याने किमती अधिक असूनही संकरीत बियाणांकडे शेतकरी वळला आहे.बिल जपा पिशवी उघडा टॅगच्या विरुद्ध दिशेने, उगवण कमी तर करा तक्रारभात बियाणे खरेदी केल्यानंतर तसेच पेरणीपूर्वी शेतकºयांनी योग्यती खबरदारी घेतल्यास सदोष बियाण्यांच्या फसवणुकीचा धोका टाळता येतो. त्यानुसार बियाण्यांची पिशवी टॅगच्या विरूद्ध दिशेने फोडावी, बियाण्यांचा नमुना पिशवीत राखून ठेवावा, बिलाची सत्यप्रत जपून ठेवावी, साधारणत: ५ ते ७ दिवसात बियाणे उगवते. मात्र उगवण क्षमता कमी आढळल्यास खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची तपासणी पंचायत समितीच्या सक्षम अधिकाºयास करण्यास सांगावे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी आढळल्यास बियाणे कायदा १९६६ कलम १९ नुसार कारवाई होऊ शकते. तालुकास्तरावर बियाणे तक्र ार समतिी गठीत केलेली असते. त्यासाठी शेतकºयांनी बियाणे खरेदी केल्यानंतर, पेरणीपूर्व तसेच पीक तयार झाल्यानंतर योग्य व अभ्यासपूर्ण निरीक्षण व नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार