शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:23 IST

मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे.

बोर्डी : मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे. दरम्यान संकरीत बियाण्यांच्या खरेदीतील फसवणुकीचा धोका टाळण्याकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ विभाग पडतात. त्यापैकी कोकण विभागामध्ये तीन विभाग येतात. कोकणाचे शेती व पीकपद्धती ठरविण्यामध्ये समुद्रकिनाºयापासूनचे अंतरसुद्धा महत्वाचे आहे. त्यानुसार किनाºयापासून १५ ते २० किमी खलाटी, २० ते ६० किमी वलाटी आणि त्यानंतर घाटमाथा असे हे तीन प्रकार आहेत. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, तालुक्याचा समावेश प्रामुख्याने खलाटी आणि वलाटी क्षेत्रात होतो. तालुक्यात खरीप हंगामात १५००० हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यामध्ये हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. डहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फक्त कर्जत ७ या ११५ ते १२० दिवसाच्या कालावधीच्या भात बियाण्यांचे वाटप केले जाते आहे. या हंगामात २०० क्विंटल साठा कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. २० किलोच्या पोत्याची किंमत ८५९ रु पये आहे. मात्र सवलतीच्या दरात ४२५ रु पये आकारले जातात. या करिता लाभार्थी शेतकºयांकडे ७/१२ उतारा आवश्यक आहे. जास्तीतजास्त शेतकºयांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार भात वाणाच्या अन्य जातींचे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र ते उपलब्ध नसल्याने किमती अधिक असूनही संकरीत बियाणांकडे शेतकरी वळला आहे.बिल जपा पिशवी उघडा टॅगच्या विरुद्ध दिशेने, उगवण कमी तर करा तक्रारभात बियाणे खरेदी केल्यानंतर तसेच पेरणीपूर्वी शेतकºयांनी योग्यती खबरदारी घेतल्यास सदोष बियाण्यांच्या फसवणुकीचा धोका टाळता येतो. त्यानुसार बियाण्यांची पिशवी टॅगच्या विरूद्ध दिशेने फोडावी, बियाण्यांचा नमुना पिशवीत राखून ठेवावा, बिलाची सत्यप्रत जपून ठेवावी, साधारणत: ५ ते ७ दिवसात बियाणे उगवते. मात्र उगवण क्षमता कमी आढळल्यास खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची तपासणी पंचायत समितीच्या सक्षम अधिकाºयास करण्यास सांगावे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी आढळल्यास बियाणे कायदा १९६६ कलम १९ नुसार कारवाई होऊ शकते. तालुकास्तरावर बियाणे तक्र ार समतिी गठीत केलेली असते. त्यासाठी शेतकºयांनी बियाणे खरेदी केल्यानंतर, पेरणीपूर्व तसेच पीक तयार झाल्यानंतर योग्य व अभ्यासपूर्ण निरीक्षण व नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार