शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमना विरोधात रास्ता रोको, महिलांचा मोठा सहभाग, आंदोलकांनी पाच तास रोखला डहाणू बोर्डी राज्यमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:07 IST

महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.

- अनिरुद्ध पाटील बोर्डी: महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. अखेर वीज मंडळाच्या डहाणू विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांनी भारनियमनाचे तास कमी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.महावितरणने भारिनयमनाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा समावेश वीज मंडळाच्या बोर्डी फिडरमध्ये आहे. येथे प्रतिदिन पहाटे ६ ते दुपारी २ आणि सायंकाळी ७ ते रात्री बारा असे सुमारे तेरा तास भारनियमन केले जाते. याचा त्रास विद्यार्थी, पालक आणि शाळेत अध्यापन करणाºया शिक्षकांना होतो.झाई हे राज्यातील प्रमुख मासेमारी केंद्र आहे. मासे हे नाशवंत असल्याने त्यांना शितकपाटात ठेवणे अत्यावश्यक असते. मात्र भारनियमनामुळे व्यवसायला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत होता. बोरिगाव हा भाग बागायतींचा असल्याने कृषी जोडण्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, वीज भारनियमन बंद करण्याचे किंवा कालावधी कमी करण्याकरिता नागरिकांनी लेखी निवेदन वीज मंडळाला दिले होते. त्याची दखल न घेतल्याने मंगळवारी दुपारी अकरा वाजता सुमारे चारशे नागरिकांनी बार्डी वीज उप केंद्राला घेराव घातला.त्यानंतर डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील विहन्द्रा पूल येथे रस्ता रोको करण्यात आला. त्या मध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती.दरम्यान, जमावाला हिंसक वळण लागू नये या करिता घोलवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर वीज मंडळाच्या डहाणू विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांनी धाव घेऊन जमावाचे निवेदन स्वीकारले व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने १३ तासाच्या भारनियमनाचा कालावधी साडेआठ तास केल्याचे लिखित आश्वासन साडेचार वाजता दिले. त्यामुळे दिवसभर रणरणत्या उन्हात बसलेल्या शेकडो आंदोलकांचा विजय झाला. आंदोलकांनी तत्काळ रस्ता मोकळा केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. आता या आश्वासनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.हे भारनियमन तात्पुरत्या कालावधीसाठी असून वेळा पत्रक पूर्ववत होईल. आंदोलकांची मागणी वरिष्ठांपर्यंत ठेवण्यात आली. त्यानुसार साडेआठ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येईल.- भूपेंद्र धोडी (वीज मंडळाच्या डहाणूविभागाचे उपकार्यकारी अभियंता)शहरी व ग्रामीण असा भारिनयमनाचा कालावधी ठरवताना दुजाभाव केला जाऊ नये. हा भाग महत्वाचे मासेमारी केंद्र व शेतीमाल उत्पादन करणारा असल्याने हे भारनियमन रद्द करावे.-अर्जुन वांगड(उपसरपंच झाई-बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायत)नागरिक, मच्छीमार सोसायट्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने आंदोलन यशस्वी झाले.- आशिष तांडेल (युवा मच्छीमार नेता)