शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

भारनियमना विरोधात रास्ता रोको, महिलांचा मोठा सहभाग, आंदोलकांनी पाच तास रोखला डहाणू बोर्डी राज्यमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:07 IST

महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.

- अनिरुद्ध पाटील बोर्डी: महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. अखेर वीज मंडळाच्या डहाणू विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांनी भारनियमनाचे तास कमी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.महावितरणने भारिनयमनाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा समावेश वीज मंडळाच्या बोर्डी फिडरमध्ये आहे. येथे प्रतिदिन पहाटे ६ ते दुपारी २ आणि सायंकाळी ७ ते रात्री बारा असे सुमारे तेरा तास भारनियमन केले जाते. याचा त्रास विद्यार्थी, पालक आणि शाळेत अध्यापन करणाºया शिक्षकांना होतो.झाई हे राज्यातील प्रमुख मासेमारी केंद्र आहे. मासे हे नाशवंत असल्याने त्यांना शितकपाटात ठेवणे अत्यावश्यक असते. मात्र भारनियमनामुळे व्यवसायला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत होता. बोरिगाव हा भाग बागायतींचा असल्याने कृषी जोडण्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, वीज भारनियमन बंद करण्याचे किंवा कालावधी कमी करण्याकरिता नागरिकांनी लेखी निवेदन वीज मंडळाला दिले होते. त्याची दखल न घेतल्याने मंगळवारी दुपारी अकरा वाजता सुमारे चारशे नागरिकांनी बार्डी वीज उप केंद्राला घेराव घातला.त्यानंतर डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील विहन्द्रा पूल येथे रस्ता रोको करण्यात आला. त्या मध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती.दरम्यान, जमावाला हिंसक वळण लागू नये या करिता घोलवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर वीज मंडळाच्या डहाणू विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांनी धाव घेऊन जमावाचे निवेदन स्वीकारले व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने १३ तासाच्या भारनियमनाचा कालावधी साडेआठ तास केल्याचे लिखित आश्वासन साडेचार वाजता दिले. त्यामुळे दिवसभर रणरणत्या उन्हात बसलेल्या शेकडो आंदोलकांचा विजय झाला. आंदोलकांनी तत्काळ रस्ता मोकळा केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. आता या आश्वासनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.हे भारनियमन तात्पुरत्या कालावधीसाठी असून वेळा पत्रक पूर्ववत होईल. आंदोलकांची मागणी वरिष्ठांपर्यंत ठेवण्यात आली. त्यानुसार साडेआठ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येईल.- भूपेंद्र धोडी (वीज मंडळाच्या डहाणूविभागाचे उपकार्यकारी अभियंता)शहरी व ग्रामीण असा भारिनयमनाचा कालावधी ठरवताना दुजाभाव केला जाऊ नये. हा भाग महत्वाचे मासेमारी केंद्र व शेतीमाल उत्पादन करणारा असल्याने हे भारनियमन रद्द करावे.-अर्जुन वांगड(उपसरपंच झाई-बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायत)नागरिक, मच्छीमार सोसायट्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने आंदोलन यशस्वी झाले.- आशिष तांडेल (युवा मच्छीमार नेता)