शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 03:51 IST

येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती.

डहाणू : येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती. या दोनही घटनांत काहींचा बळीही गेला होता. या घटनांपासून कुणी काहीही धडा शिकले नाही, त्यामुळे आजचीही घटना घडली. त्यामुळे ठराविक काळाने अशा दुर्घटना घडत असतात.या तीनही घटनांना लाँन्च मालकांचा जास्ती कमाई करण्याचा लोभ व त्यासाठी जास्त प्रवासी भरण्याची हाव तर त्यात बसलेल्या प्रवाशांनी बोटीचा तोल राखण्याबाबत दाखविलेली बेदरकारी हीच कारणे कारणीभूत ठरली होती. सिल्व्हासा येथील एका रिसॉर्टच्या मालकाने आपल्या पर्यटकांना जलसफर घडविण्यासाठी नवी कोरी अत्याधुनिक लाँन्च घेतली होती तिच्यातून सैर करण्यासाठी आपल्या मुंबईच्या मित्र परिवाराला खास आमंत्रीत केले होते. स्वत: तिचे मालक यावेळी त्यांच्या सोबत होते.तरीही त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रवासी संख्येचे बंधन झुगारले व त्याची किंमत बोटीतील काहींना आपल्या प्राणाचे मोल देऊन मोजावी लागली.खोचिवडे-उत्तन समुद्रातील घटनाही अशीच होती तिथे लाँन्च नव्हत्याच त्यामुळे गावातीलच होडीवाला स्थानिक प्रवाशांची छोट्या अंतरासाठी ने-आण करायचा मुळात ही बोट प्रवासी वाहतूकीसाठी नव्हतीच तरीही ती त्यासाठी वापरली गेली. ते करतांनाही प्रवासीसंख्येचे बंधन पाळले नाही. मिळतील तेवढे भाविक भरले गेले. त्यातून अनर्थ घडला आणि यात्रेचे रूपांतर सुतकी परिवारात झाले.शनिवारच्या घटनेतही असेच घडले. या किनाºयावर ही बोट तीन चार दिवसांपूर्वीच समुद्रातली जवळच्या अंतरावरील ट्रीप घडविण्यासाठी आणली गेली होती. समुद्र उथळ असल्याने ती किनाºयापर्यंत आणता येत नव्हती त्यामुळे ती ३० ते ४० मीटर खोल नांगरून ठेवली जात होती. बोटीतून प्रवासी अथवा पर्यटक तिच्यापर्यंत नेले जात होते. याही वेळी प्रवासी संख्येचे बंधन आणि बोटीचा तोल सांभाळण्याचा नियम पाळला गेला नाही त्यातून हा अनर्थ घडला.अशी घडली दुर्घटना झाला आक्रोशया दुर्घटनेतून बचावलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी आम्ही कॉलेज संपल्यावर समुद्राच्या सफरीवर जायचे ठरविले. आमच्याच गृपमधील काही जण आमच्या आधी अशी सैर करून सुखरूप आले होते. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. म्हणून आम्हीही अशा सफरीवर जायचे ठरविले. छोटया होडक्यातून आम्ही लॉन्च पर्यंत गेलो. सगळे बसल्यावर धांगडधिंगा सुरू झाला. कोण काय करतो आहे हे कुणालाच कळत नव्हते.सेल्फी काढण्याची स्पर्धा सुरू झाली. सगळयांनाच लॉन्चच्या एका बाजूच्या कडेला जाऊन सेल्फी काढायचे होते. तो चांगला येण्यासाठी सगळयांच्या चेहºयावर भरपूर प्रकाश येणे आवश्यक होते त्यामुळे सगळे ग्रुप लॉन्चच्या डाव्या बाजूच्या कडेवर एकवटले त्यामुळे लॉन्चचा तोल गेला. काय होते आहे हे कळण्यापूर्वीच ती कलंडली आणि काही पाण्यात पडले तर बोटीत पाणी शीरू लागताच रडारड आणि आईऽऽ ग च्या किंकाळया सुरु झाल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार