शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 03:51 IST

येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती.

डहाणू : येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती. या दोनही घटनांत काहींचा बळीही गेला होता. या घटनांपासून कुणी काहीही धडा शिकले नाही, त्यामुळे आजचीही घटना घडली. त्यामुळे ठराविक काळाने अशा दुर्घटना घडत असतात.या तीनही घटनांना लाँन्च मालकांचा जास्ती कमाई करण्याचा लोभ व त्यासाठी जास्त प्रवासी भरण्याची हाव तर त्यात बसलेल्या प्रवाशांनी बोटीचा तोल राखण्याबाबत दाखविलेली बेदरकारी हीच कारणे कारणीभूत ठरली होती. सिल्व्हासा येथील एका रिसॉर्टच्या मालकाने आपल्या पर्यटकांना जलसफर घडविण्यासाठी नवी कोरी अत्याधुनिक लाँन्च घेतली होती तिच्यातून सैर करण्यासाठी आपल्या मुंबईच्या मित्र परिवाराला खास आमंत्रीत केले होते. स्वत: तिचे मालक यावेळी त्यांच्या सोबत होते.तरीही त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रवासी संख्येचे बंधन झुगारले व त्याची किंमत बोटीतील काहींना आपल्या प्राणाचे मोल देऊन मोजावी लागली.खोचिवडे-उत्तन समुद्रातील घटनाही अशीच होती तिथे लाँन्च नव्हत्याच त्यामुळे गावातीलच होडीवाला स्थानिक प्रवाशांची छोट्या अंतरासाठी ने-आण करायचा मुळात ही बोट प्रवासी वाहतूकीसाठी नव्हतीच तरीही ती त्यासाठी वापरली गेली. ते करतांनाही प्रवासीसंख्येचे बंधन पाळले नाही. मिळतील तेवढे भाविक भरले गेले. त्यातून अनर्थ घडला आणि यात्रेचे रूपांतर सुतकी परिवारात झाले.शनिवारच्या घटनेतही असेच घडले. या किनाºयावर ही बोट तीन चार दिवसांपूर्वीच समुद्रातली जवळच्या अंतरावरील ट्रीप घडविण्यासाठी आणली गेली होती. समुद्र उथळ असल्याने ती किनाºयापर्यंत आणता येत नव्हती त्यामुळे ती ३० ते ४० मीटर खोल नांगरून ठेवली जात होती. बोटीतून प्रवासी अथवा पर्यटक तिच्यापर्यंत नेले जात होते. याही वेळी प्रवासी संख्येचे बंधन आणि बोटीचा तोल सांभाळण्याचा नियम पाळला गेला नाही त्यातून हा अनर्थ घडला.अशी घडली दुर्घटना झाला आक्रोशया दुर्घटनेतून बचावलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी आम्ही कॉलेज संपल्यावर समुद्राच्या सफरीवर जायचे ठरविले. आमच्याच गृपमधील काही जण आमच्या आधी अशी सैर करून सुखरूप आले होते. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. म्हणून आम्हीही अशा सफरीवर जायचे ठरविले. छोटया होडक्यातून आम्ही लॉन्च पर्यंत गेलो. सगळे बसल्यावर धांगडधिंगा सुरू झाला. कोण काय करतो आहे हे कुणालाच कळत नव्हते.सेल्फी काढण्याची स्पर्धा सुरू झाली. सगळयांनाच लॉन्चच्या एका बाजूच्या कडेला जाऊन सेल्फी काढायचे होते. तो चांगला येण्यासाठी सगळयांच्या चेहºयावर भरपूर प्रकाश येणे आवश्यक होते त्यामुळे सगळे ग्रुप लॉन्चच्या डाव्या बाजूच्या कडेवर एकवटले त्यामुळे लॉन्चचा तोल गेला. काय होते आहे हे कळण्यापूर्वीच ती कलंडली आणि काही पाण्यात पडले तर बोटीत पाणी शीरू लागताच रडारड आणि आईऽऽ ग च्या किंकाळया सुरु झाल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार