शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 03:51 IST

येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती.

डहाणू : येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती. या दोनही घटनांत काहींचा बळीही गेला होता. या घटनांपासून कुणी काहीही धडा शिकले नाही, त्यामुळे आजचीही घटना घडली. त्यामुळे ठराविक काळाने अशा दुर्घटना घडत असतात.या तीनही घटनांना लाँन्च मालकांचा जास्ती कमाई करण्याचा लोभ व त्यासाठी जास्त प्रवासी भरण्याची हाव तर त्यात बसलेल्या प्रवाशांनी बोटीचा तोल राखण्याबाबत दाखविलेली बेदरकारी हीच कारणे कारणीभूत ठरली होती. सिल्व्हासा येथील एका रिसॉर्टच्या मालकाने आपल्या पर्यटकांना जलसफर घडविण्यासाठी नवी कोरी अत्याधुनिक लाँन्च घेतली होती तिच्यातून सैर करण्यासाठी आपल्या मुंबईच्या मित्र परिवाराला खास आमंत्रीत केले होते. स्वत: तिचे मालक यावेळी त्यांच्या सोबत होते.तरीही त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रवासी संख्येचे बंधन झुगारले व त्याची किंमत बोटीतील काहींना आपल्या प्राणाचे मोल देऊन मोजावी लागली.खोचिवडे-उत्तन समुद्रातील घटनाही अशीच होती तिथे लाँन्च नव्हत्याच त्यामुळे गावातीलच होडीवाला स्थानिक प्रवाशांची छोट्या अंतरासाठी ने-आण करायचा मुळात ही बोट प्रवासी वाहतूकीसाठी नव्हतीच तरीही ती त्यासाठी वापरली गेली. ते करतांनाही प्रवासीसंख्येचे बंधन पाळले नाही. मिळतील तेवढे भाविक भरले गेले. त्यातून अनर्थ घडला आणि यात्रेचे रूपांतर सुतकी परिवारात झाले.शनिवारच्या घटनेतही असेच घडले. या किनाºयावर ही बोट तीन चार दिवसांपूर्वीच समुद्रातली जवळच्या अंतरावरील ट्रीप घडविण्यासाठी आणली गेली होती. समुद्र उथळ असल्याने ती किनाºयापर्यंत आणता येत नव्हती त्यामुळे ती ३० ते ४० मीटर खोल नांगरून ठेवली जात होती. बोटीतून प्रवासी अथवा पर्यटक तिच्यापर्यंत नेले जात होते. याही वेळी प्रवासी संख्येचे बंधन आणि बोटीचा तोल सांभाळण्याचा नियम पाळला गेला नाही त्यातून हा अनर्थ घडला.अशी घडली दुर्घटना झाला आक्रोशया दुर्घटनेतून बचावलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी आम्ही कॉलेज संपल्यावर समुद्राच्या सफरीवर जायचे ठरविले. आमच्याच गृपमधील काही जण आमच्या आधी अशी सैर करून सुखरूप आले होते. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. म्हणून आम्हीही अशा सफरीवर जायचे ठरविले. छोटया होडक्यातून आम्ही लॉन्च पर्यंत गेलो. सगळे बसल्यावर धांगडधिंगा सुरू झाला. कोण काय करतो आहे हे कुणालाच कळत नव्हते.सेल्फी काढण्याची स्पर्धा सुरू झाली. सगळयांनाच लॉन्चच्या एका बाजूच्या कडेला जाऊन सेल्फी काढायचे होते. तो चांगला येण्यासाठी सगळयांच्या चेहºयावर भरपूर प्रकाश येणे आवश्यक होते त्यामुळे सगळे ग्रुप लॉन्चच्या डाव्या बाजूच्या कडेवर एकवटले त्यामुळे लॉन्चचा तोल गेला. काय होते आहे हे कळण्यापूर्वीच ती कलंडली आणि काही पाण्यात पडले तर बोटीत पाणी शीरू लागताच रडारड आणि आईऽऽ ग च्या किंकाळया सुरु झाल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार