शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत पाण्याची ओरड

By admin | Updated: December 10, 2015 01:50 IST

शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे

कल्याण : शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे. पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी संतप्त शिवसेना नगरसेवकांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौर, नगरसेवक व पाणी पुरवठा अभियंता यांच्या एक बैठक पार पडली. त्यानंतर पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. तोडगा निघालाच तर पूर्वेतील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. अन्यथा कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्न हा तसाच कायम राहून नागरिकांची पाण्याविना फरपट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पूर्वेला पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून आहे. पूर्व भाग हा उंच सखल आहे. भौगोलिक स्थिती पाणी पुरवठयासाठी अनूकूल नाही. नागरीकांनी मोर्चे काढले. आंदोलने केली आहेत. रस्त्यावर उतरून हा प्रश्न विधीमंडळापर्यंत चर्चेला नेऊन देखील प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे आहे. पाणी कमी दाबाने येते.त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्यात किडे आढळले. याबाबत तक्रार करूनही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. १शिवसेना नगरसेवक स्नेहल पिंगळे, निलेश शिंदे, माधुरी काळे, राजाराम पावशे, शितल भंडारी यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. शनिनगर, आनंदवाडी, विजयनगर याठिकाणी पाण्याची तीव्र समस्या नागरीकांना सतावत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा योजना राबविल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे मान्य केले होते. आजमितीस पाणी टंचाईचे कारण पुढे करुन ३५ दशलक्ष लिटरच पाणी पुरविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पाणी टंचाईसाठी संप, विजेअभावी पंप बंद आहे. २नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली अशी कारणे सांगितली जातात. ही कारणे कल्याण पूर्वेसाठी असतील तर कल्याण पश्चिम व डोंबिवली शहरासाठी का लागू होत नाही. त्याठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत असतो. याचाच अर्थ कल्याण पूर्वेला दुजाभावाची वागणूक महापालिका प्रशासनाकडून दिली जात आहे. ३महापालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली नव्हती. महापालिका औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून होती. त्यावेळी तत्कालीन महापौर वैजयंती घोलप यांनी १० दशलक्ष लिटरचा वाढीव पाणी पुरवठा कल्याण पूर्वेला करण्यासाठी ठराव केला होता. मात्र त्याला महामंडळाने हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे तो ठराव कागदावर राहिला. घोलप यांनी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात त्या जखमी झाल्या होत्या. तसेच तत्कालीन मनसे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी महामंडळाच्या कार्यालयातील खूर्ची कार्यालयाबाहेर फेकून दिली होती. नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले होते.