शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

कल्याण पूर्वेत पाण्याची ओरड

By admin | Updated: December 10, 2015 01:50 IST

शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे

कल्याण : शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे. पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी संतप्त शिवसेना नगरसेवकांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौर, नगरसेवक व पाणी पुरवठा अभियंता यांच्या एक बैठक पार पडली. त्यानंतर पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. तोडगा निघालाच तर पूर्वेतील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. अन्यथा कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्न हा तसाच कायम राहून नागरिकांची पाण्याविना फरपट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पूर्वेला पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून आहे. पूर्व भाग हा उंच सखल आहे. भौगोलिक स्थिती पाणी पुरवठयासाठी अनूकूल नाही. नागरीकांनी मोर्चे काढले. आंदोलने केली आहेत. रस्त्यावर उतरून हा प्रश्न विधीमंडळापर्यंत चर्चेला नेऊन देखील प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे आहे. पाणी कमी दाबाने येते.त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्यात किडे आढळले. याबाबत तक्रार करूनही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. १शिवसेना नगरसेवक स्नेहल पिंगळे, निलेश शिंदे, माधुरी काळे, राजाराम पावशे, शितल भंडारी यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. शनिनगर, आनंदवाडी, विजयनगर याठिकाणी पाण्याची तीव्र समस्या नागरीकांना सतावत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा योजना राबविल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे मान्य केले होते. आजमितीस पाणी टंचाईचे कारण पुढे करुन ३५ दशलक्ष लिटरच पाणी पुरविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पाणी टंचाईसाठी संप, विजेअभावी पंप बंद आहे. २नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली अशी कारणे सांगितली जातात. ही कारणे कल्याण पूर्वेसाठी असतील तर कल्याण पश्चिम व डोंबिवली शहरासाठी का लागू होत नाही. त्याठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत असतो. याचाच अर्थ कल्याण पूर्वेला दुजाभावाची वागणूक महापालिका प्रशासनाकडून दिली जात आहे. ३महापालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली नव्हती. महापालिका औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून होती. त्यावेळी तत्कालीन महापौर वैजयंती घोलप यांनी १० दशलक्ष लिटरचा वाढीव पाणी पुरवठा कल्याण पूर्वेला करण्यासाठी ठराव केला होता. मात्र त्याला महामंडळाने हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे तो ठराव कागदावर राहिला. घोलप यांनी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात त्या जखमी झाल्या होत्या. तसेच तत्कालीन मनसे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी महामंडळाच्या कार्यालयातील खूर्ची कार्यालयाबाहेर फेकून दिली होती. नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले होते.