शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दापचरी प्रकल्पातील करोडो रूपयांची मशिनरी धूळखात

By admin | Updated: February 13, 2017 04:47 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी दुग्ध प्रकल्पासाठी शासनाने २६ शे हेक्टर जमीन संपादित केली आहे. हा प्रकल्प शासनाच्या उदासीन

शौकत शेख / डहाणूमुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी दुग्ध प्रकल्पासाठी शासनाने २६ शे हेक्टर जमीन संपादित केली आहे. हा प्रकल्प शासनाच्या उदासीन कारभारामुळे भाकड होऊन बंद पडला आहे. त्यामुळे हेतू साध्य न होता ही जमीन प्रकल्पग्रस्त आदिवासींना परत करण्याची मागणी स्थानिक आदिवासींनी केली आहे. या प्रकल्पासाठी खर्च केलेली करोडो रु पयाच्या शीतगृह मशिनरी धूळ खात पडली आहे. तर अद्यापि गरज नसताना लहान मोठी बांधकामे करु न अधिकारी व ठेकेदार संगनमताने शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करीत आहेत. कोट्यवधीचे देखभाल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने चोरीचे प्रकार घडत आहेत. ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी युनीटचे वाटप करण्यात आलेले होते. त्या शेतकऱ्यांनी उद्योगपती, राजकीय नेते, धनदांडगे, सिने कलाकार यांना परस्पर विक्री केल्याने सध्या स्थितीत प्रकल्पात शुकशुकाट आहे. तर या कृषीक्षेत्राचा ( युनिट) चा वापर मौजमजा करण्यासाठी केला जात आहे. तर विस्थापित आदिवासींना हा प्रकार पाहून खंत वाटत आहे. आदिवासी जमीनीवरील दापचरी प्रकल्पाचे खाजगीकरण न करता बंद पडलेला दापचरी दुग्ध प्रकल्प शासनाने पुन्हा सुरू करावा. नाहीतर नियमानुसार पाच किंवा त्या पेक्षा जास्त वर्ष एखाद्या प्रकल्पासाठी संपादित जमीन सरकारने त्याच प्रकल्पासाठी न वापरता पडिक ठेवली तर ती पुन्हा मुळ जमीन मालकाला परत देण्याचे कायदा सांगतो. त्या कायद्यानुसार दापचरी दुग्ध प्रकल्पाची जागा संपादित झाल्यापासूनच सरकारने वापरलेली नसून वहिवाटीने कसत असलेल्या आदिवासींना त्या जमीनी परत मिळाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.जपानच्या धरतीवर भारतात बुलेट ट्रेन, स्पेशल मालवाहक रेल्वे , मुंबई, रत्नागिरी सारख्या असलेल्या बंदराची क्षमता वाढवून पर्यावरण व लोकांचे नुकसान करून वाढवण सारखे महाकाय बंदर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील डहाणू पट्ट्यात आणणे, मुंबई - अहमदाबाद हा ८ पदरी राष्ट्रीय महामार्ग असताना फक्त एक किलोमीटर अंतरावर नवीन सुपरफास्ट हायवे बांधणे. यामुळे आदिवासी समाजाला विस्थापीत करु न, त्यांच्या जमीनी अधिग्रहित करून आदोवासींना देशोधडीला लावण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.