शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

राजीवली प्रकरणी चाळमाफियांवर गुन्हे; पालिकेचे अधिकारी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:24 IST

राजीवली परिसरात बेकायदा चाळी उभारणाºया सात चाळ माफियांविरोधात महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली आहे.

- शशी करपेवसई : राजीवली परिसरात बेकायदा चाळी उभारणाºया सात चाळ माफियांविरोधात महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली आहे. मात्र, यात अनेकांचे संसार उघड्यावर आले असून बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणाºया महापालिका अधिकाºयांवरही गु्न्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.राजीवली परिसरात महसूल, वन, आदिवासी यासह खाजगी जागांवर अतिक्रमण करून चाळमाफियांनी एक हजारांहून अधिक बेकायदा चाळी बांधल्या आहेत. गुरुवारी महापालिकेने या ठिकाणी बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केल्यानंतर जनक्षोभ निर्माण झाला. चारशे लोकांच्या जमावाने महापालिका आणि पोलिस अधिकारी-कर्मचाºयांवर हल्ला चढवला होता. ाात काही पोलीस आणि महापालिका कर्मचारी जखमी झाले होते. तर हल्लेखोरांनी जेसीबी, कार, मोटार सायकलींना आगी लावल्या होत्या.याप्रकरणी वालीव पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून २१ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच प्रमुख बिल्डर रंधा सिंह याच्यासह विकास सिंग, मनोज सिंग मिळून सात चाळमाफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण फरार झाले आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळी काही गाड्या जप्त केल्या असून त्यावरून हल्लेखोर बाहेरून आल्याचा संशय आहे. त्यामुळे गाड्यांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.चाळ माफियांबरोबरच अधिकारीही जबाबदारयाठिकाणी एक हजारांहून अधिक चाळी बांधल्या गेल्या आहेत. पालिकेने लोकांना घराबाहेर काढून खोल्या पाडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या चाळी गेल्या अनेक दिवसांपासून बांधण्याचे काम केले जात असताना पालिका अधिकारी-कर्मचाºयांनी त्यावर का कारवाई केली नाही असा संतप्त सवाल भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केला आहे. याभागातील संंबंधित अधिकाºयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बारोट यांनी केली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले असले तरी मुख्य सूत्रधार दारा आणि रंधा मोकाट आहेत. यापूर्वी त्यांच्याविरोधात खूनासारखे गंभीर गुन्हे ही दाखल आहेत. त्यामुळे यात सहभागी असलेल्या चाळमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी आमदार विवेक पंडित यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार