शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिल्डरांविरुद्ध गुन्हे!

By admin | Updated: November 15, 2016 04:08 IST

वसई तालुक्यातील विरार जवळील आगाशी गावच्या बारीवाडा विभागातील १०० वर्षे जुन्या तिवरांच्या झाडांची प्रचंड कत्तल करून त्या जागेवर भराव घालून बेकायदेशीर चाळी

हितेन नाईक / पालघरवसई तालुक्यातील विरार जवळील आगाशी गावच्या बारीवाडा विभागातील १०० वर्षे जुन्या तिवरांच्या झाडांची प्रचंड कत्तल करून त्या जागेवर भराव घालून बेकायदेशीर चाळी उभारणाऱ्या बिल्डरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यानी वसई तहसीलदारांना दिले आहेत.वसईतील मौजे डबाखार कोल्हापूर आगाशी बारीवाडा विभागात सुमारे अडीच एकर जमिनीवर तिवरांचे घनदाट जंगल होते. आगाशी गावातील महेश यशवंत भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन २००९ पासून या तिवरांची कत्तल केली असून त्या जागी भराव करून त्यावर बैठ्या चाळी बांधल्या. याबद्दल बारीवाडा ग्रामस्थांनी वारंवार वसईचे उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याशी पत्रवाव्यहार केला. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. परंतु अनिकेत वाडीवकर यांनी गूगल अर्थच्या माध्यमातून सन २००६ , २००९ व २०१६ च्या तिवरांच्या परिस्थिती चे फोटो मिळवून, हे फोटो व माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती यासह उपजिल्हाधिकारी व तहसीलदारां कडे तक्रार दाखल केली. पाठपुरावा करून महसूल खात्यास कारवाई करायला भाग पाडले.महेश भोईर व साथीदारांनी या तिवरांची कत्तल व त्या जागी माती भराव केल्याचे अहवालात नोंद करून हा अहवाल २० आॅक्टोबर रोजी तहसीलदार यांना सादर करण्यात आला. तहसीलदारांनी दोन दिवसात फौजदारी गुन्हा दाखल होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आठ दिवस उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी अभिजित बांगर याना ट्विट करून माहिती दिली. या नंतर बांगर यांनी स्वत: लक्ष घालून वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे याना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.