शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘त्या’ बिल्डरांविरुद्ध गुन्हे!

By admin | Updated: November 15, 2016 04:08 IST

वसई तालुक्यातील विरार जवळील आगाशी गावच्या बारीवाडा विभागातील १०० वर्षे जुन्या तिवरांच्या झाडांची प्रचंड कत्तल करून त्या जागेवर भराव घालून बेकायदेशीर चाळी

हितेन नाईक / पालघरवसई तालुक्यातील विरार जवळील आगाशी गावच्या बारीवाडा विभागातील १०० वर्षे जुन्या तिवरांच्या झाडांची प्रचंड कत्तल करून त्या जागेवर भराव घालून बेकायदेशीर चाळी उभारणाऱ्या बिल्डरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यानी वसई तहसीलदारांना दिले आहेत.वसईतील मौजे डबाखार कोल्हापूर आगाशी बारीवाडा विभागात सुमारे अडीच एकर जमिनीवर तिवरांचे घनदाट जंगल होते. आगाशी गावातील महेश यशवंत भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन २००९ पासून या तिवरांची कत्तल केली असून त्या जागी भराव करून त्यावर बैठ्या चाळी बांधल्या. याबद्दल बारीवाडा ग्रामस्थांनी वारंवार वसईचे उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याशी पत्रवाव्यहार केला. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. परंतु अनिकेत वाडीवकर यांनी गूगल अर्थच्या माध्यमातून सन २००६ , २००९ व २०१६ च्या तिवरांच्या परिस्थिती चे फोटो मिळवून, हे फोटो व माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती यासह उपजिल्हाधिकारी व तहसीलदारां कडे तक्रार दाखल केली. पाठपुरावा करून महसूल खात्यास कारवाई करायला भाग पाडले.महेश भोईर व साथीदारांनी या तिवरांची कत्तल व त्या जागी माती भराव केल्याचे अहवालात नोंद करून हा अहवाल २० आॅक्टोबर रोजी तहसीलदार यांना सादर करण्यात आला. तहसीलदारांनी दोन दिवसात फौजदारी गुन्हा दाखल होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आठ दिवस उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी अभिजित बांगर याना ट्विट करून माहिती दिली. या नंतर बांगर यांनी स्वत: लक्ष घालून वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे याना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.