शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

कासा परिसरामध्ये भातकापण्या रखडल्या; पावसाच्या लपंडावाने पारंपरिक शेती तोट्यात, घरच्या माणसांकडून शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:13 IST

डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून भातपिकासाठी पोषक असा पाऊस झाला होता. रोगराईही कमी त्यामुळे भातपीक चांगले असल्याने अधिक उत्पन्न मिळणार या आशेने बळीराजा सुखावला होता. मात्र, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे कापणीच्या हंगामात आलेले भातपीक शेतातच कोलमडून आडवी पडली आणि शेती सतत पाण्याने भरून राहिल्याने काही ठिकाणी कुजून गेली. सतत ओलाव्यामुळे उशिरा भारोपणी केलेल्या पिकांचे दाने पुन्हा उगवले. अशा स्थितीतही शेतीचे मोठे नुकसान झाले असतांनाही शेतक-यांनी थोडाफार खर्च वसूलीच्या हेतूने भातकापणीस सुरूवात केली.मात्र भातकापणीस मजूराच मिळत नाहीत. मजूरांच्या टंचाईमुळे मजूरांनी जास्त मजूरीची मागणी केली. वर्षभरापूर्वी २०० ते २५० रूपय व दुपारी एकवेळचे जेवणावर असलेले मजूर आता २५० ते ३०० रुपये मजूरीची मागणी करू लागलेत. त्यातही वाडा, भिवंडी, पालघर, वसई परिसरातील शेतकºयांनी दिवसभराच्या जेवणासह ३०० ते ३५० रू मजूरी देवून कासा, सायवन, गंजाड, तलवाडा भागातील मजूर कापणीस नेल्याने कासा परिसरात मजूरांची टंचाई झाली आहे. आधीच नुकसान त्यात भातशेतीची कापणी लांबणीवर गेल्याने शेतकºयांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी एक दोन मजूर हाताशी घेवून घरच्या मंडळीसह भातकापणी करत आहेत. तर ज्या ठिकाणी जास्तच नुकसान झाले आहे. तेथील भातशेती कापणी न करतातच शेतकºयांनी सोडून देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार