शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कासा परिसरामध्ये भातकापण्या रखडल्या; पावसाच्या लपंडावाने पारंपरिक शेती तोट्यात, घरच्या माणसांकडून शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:13 IST

डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून भातपिकासाठी पोषक असा पाऊस झाला होता. रोगराईही कमी त्यामुळे भातपीक चांगले असल्याने अधिक उत्पन्न मिळणार या आशेने बळीराजा सुखावला होता. मात्र, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे कापणीच्या हंगामात आलेले भातपीक शेतातच कोलमडून आडवी पडली आणि शेती सतत पाण्याने भरून राहिल्याने काही ठिकाणी कुजून गेली. सतत ओलाव्यामुळे उशिरा भारोपणी केलेल्या पिकांचे दाने पुन्हा उगवले. अशा स्थितीतही शेतीचे मोठे नुकसान झाले असतांनाही शेतक-यांनी थोडाफार खर्च वसूलीच्या हेतूने भातकापणीस सुरूवात केली.मात्र भातकापणीस मजूराच मिळत नाहीत. मजूरांच्या टंचाईमुळे मजूरांनी जास्त मजूरीची मागणी केली. वर्षभरापूर्वी २०० ते २५० रूपय व दुपारी एकवेळचे जेवणावर असलेले मजूर आता २५० ते ३०० रुपये मजूरीची मागणी करू लागलेत. त्यातही वाडा, भिवंडी, पालघर, वसई परिसरातील शेतकºयांनी दिवसभराच्या जेवणासह ३०० ते ३५० रू मजूरी देवून कासा, सायवन, गंजाड, तलवाडा भागातील मजूर कापणीस नेल्याने कासा परिसरात मजूरांची टंचाई झाली आहे. आधीच नुकसान त्यात भातशेतीची कापणी लांबणीवर गेल्याने शेतकºयांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी एक दोन मजूर हाताशी घेवून घरच्या मंडळीसह भातकापणी करत आहेत. तर ज्या ठिकाणी जास्तच नुकसान झाले आहे. तेथील भातशेती कापणी न करतातच शेतकºयांनी सोडून देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार