शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

राखीव क्षेत्रात तिवरांची लागवड

By admin | Updated: December 26, 2015 00:26 IST

माकुणसार, विळंगी, आगरवाडी इ. गावांच्या हद्दीत पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून परिसरातील शेतजमिनीमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरू नये, यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवण्यात

पालघर : माकुणसार, विळंगी, आगरवाडी इ. गावांच्या हद्दीत पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून परिसरातील शेतजमिनीमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरू नये, यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवण्यात आले असताना वन विभागाने त्या राखीव क्षेत्रावर तिवरांची लागवड सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले असून शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.मौजे माकुणसार, विळंगी, आगरवाडी या गावांच्या हद्दीत राज्य शासनाची पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून सदर खारभूमी योजनेचे क्षेत्र हे महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार अधिसूचित केले आहे. वरील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या समुद्र, खाडी यांच्या जवळपास असल्याने भरतीचे पाणी शेतात घुसू नये, क्षेत्र सुरक्षित राहून नापीक बनू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. असे असताना या कार्यक्षेत्रात वन विभागामार्फत तिवरांची (कांदळवन) लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. पुरंदरे खारभूमी योजनेच्या प्रापण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अकृषिक लागवड ही नियमबाह्य असून या लागवडीमुळे माकुणसार, आगरवाडी, विळंगी, नगावे, तिघरे या गावांतील बागायती व शेतीक्षेत्रामध्ये खारे पाणी जाऊन त्या नापीक बनणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावातील विहिरी, कूपनलिकांमधील पिण्याचे पाणीही क्षारयुक्त व मुचूळ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नापीक होऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत, तर दुसरीकडे गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्यही निर्माण होणार असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक यांचे म्हणणे आहे. वन विभाग आणि खारभूमी सर्वेक्षण विभागामधील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून माकुणसार, विळंगी व आगरवाडी सरपंचांनी यासंदर्भात खारभूमी विभागाकडे तक्रार केल्यानंतर खारभूमी विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, वन विभाग अधिकाऱ्याकडे विचारणा आपण करावी, असे पत्र खारभूमी विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने तिन्ही गावांतील सरपंचांना कळविले आहे. त्यामुळे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक, भूपेश म्हात्रे, नरेश पाटील, वसंत भोईर, प्रदीप भोईर, प्रशांत घरत इ.नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)