शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

राखीव क्षेत्रात तिवरांची लागवड

By admin | Updated: December 26, 2015 00:26 IST

माकुणसार, विळंगी, आगरवाडी इ. गावांच्या हद्दीत पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून परिसरातील शेतजमिनीमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरू नये, यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवण्यात

पालघर : माकुणसार, विळंगी, आगरवाडी इ. गावांच्या हद्दीत पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून परिसरातील शेतजमिनीमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरू नये, यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवण्यात आले असताना वन विभागाने त्या राखीव क्षेत्रावर तिवरांची लागवड सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले असून शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.मौजे माकुणसार, विळंगी, आगरवाडी या गावांच्या हद्दीत राज्य शासनाची पुरंदरे खारभूमी योजना कार्यरत असून सदर खारभूमी योजनेचे क्षेत्र हे महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार अधिसूचित केले आहे. वरील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या समुद्र, खाडी यांच्या जवळपास असल्याने भरतीचे पाणी शेतात घुसू नये, क्षेत्र सुरक्षित राहून नापीक बनू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. असे असताना या कार्यक्षेत्रात वन विभागामार्फत तिवरांची (कांदळवन) लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. पुरंदरे खारभूमी योजनेच्या प्रापण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अकृषिक लागवड ही नियमबाह्य असून या लागवडीमुळे माकुणसार, आगरवाडी, विळंगी, नगावे, तिघरे या गावांतील बागायती व शेतीक्षेत्रामध्ये खारे पाणी जाऊन त्या नापीक बनणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावातील विहिरी, कूपनलिकांमधील पिण्याचे पाणीही क्षारयुक्त व मुचूळ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नापीक होऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत, तर दुसरीकडे गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्यही निर्माण होणार असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक यांचे म्हणणे आहे. वन विभाग आणि खारभूमी सर्वेक्षण विभागामधील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून माकुणसार, विळंगी व आगरवाडी सरपंचांनी यासंदर्भात खारभूमी विभागाकडे तक्रार केल्यानंतर खारभूमी विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, वन विभाग अधिकाऱ्याकडे विचारणा आपण करावी, असे पत्र खारभूमी विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने तिन्ही गावांतील सरपंचांना कळविले आहे. त्यामुळे शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक, भूपेश म्हात्रे, नरेश पाटील, वसंत भोईर, प्रदीप भोईर, प्रशांत घरत इ.नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)