शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

कॉरीडॉर बाधितांना दिलासा?

By admin | Updated: August 5, 2015 01:01 IST

भूमीअधिग्रहण कायद्यातील बदल करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत होते. परंतु देशभरातून विरोध झाल्यामुळे सरकारने माघार घेतली.

वसई : भूमीअधिग्रहण कायद्यातील बदल करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत होते. परंतु देशभरातून विरोध झाल्यामुळे सरकारने माघार घेतली. या माघारीमुळे डेडीकेटेड फ्रेट रेल्वे कॉरीडॉर प्रकल्पामधील वसई, पालघर, भिवंडी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्याच्या कामास भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरूवात केली होती. या जमीनी संपादन करताना अधिकारी संबंधीत शेतकऱ्यांना विश्वासात घेत नव्हते. आता हा गैरप्रकार टळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. उरण ते दिल्ली दरम्यान मालवाहतूक जलदगतीने करण्यासाठी केंद्र सरकारने डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर रेल्वे प्रकल्प राबवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत करण्यास सुरूवात केली. अनेक शेतकऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या परंतु, या जमीनीचे सर्व्हेक्षण व संपादन करतांना अधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेतल्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला होता. आता संपादीत होणाऱ्या एकूण जमिनीपैकी ७० ते ८० टक्के जमीनमालकांची अनुमती आवश्यक ठरणार आहे. तसेच भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी न करता मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले भरण्याचा अधिकार विस्थापितांना मिळणार आहे. या प्रकल्पातील रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे, शेतजमीनी व विहिरी जाणार होत्या. जुन्या कायद्यानुसार आता सर्वप्रथम बाधित शेतकऱ्यांशी चर्चा विनिमय करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)