शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कॉरीडॉर बाधितांना दिलासा?

By admin | Updated: August 5, 2015 01:01 IST

भूमीअधिग्रहण कायद्यातील बदल करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत होते. परंतु देशभरातून विरोध झाल्यामुळे सरकारने माघार घेतली.

वसई : भूमीअधिग्रहण कायद्यातील बदल करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत होते. परंतु देशभरातून विरोध झाल्यामुळे सरकारने माघार घेतली. या माघारीमुळे डेडीकेटेड फ्रेट रेल्वे कॉरीडॉर प्रकल्पामधील वसई, पालघर, भिवंडी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्याच्या कामास भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरूवात केली होती. या जमीनी संपादन करताना अधिकारी संबंधीत शेतकऱ्यांना विश्वासात घेत नव्हते. आता हा गैरप्रकार टळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. उरण ते दिल्ली दरम्यान मालवाहतूक जलदगतीने करण्यासाठी केंद्र सरकारने डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर रेल्वे प्रकल्प राबवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत करण्यास सुरूवात केली. अनेक शेतकऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या परंतु, या जमीनीचे सर्व्हेक्षण व संपादन करतांना अधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेतल्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला होता. आता संपादीत होणाऱ्या एकूण जमिनीपैकी ७० ते ८० टक्के जमीनमालकांची अनुमती आवश्यक ठरणार आहे. तसेच भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी न करता मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले भरण्याचा अधिकार विस्थापितांना मिळणार आहे. या प्रकल्पातील रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे, शेतजमीनी व विहिरी जाणार होत्या. जुन्या कायद्यानुसार आता सर्वप्रथम बाधित शेतकऱ्यांशी चर्चा विनिमय करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)