शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

Coronavirus News: सक्रिय जिल्ह्यांच्या गराड्यात पालघर डेंजर झोनमध्ये; कोरोना रुग्णवाढीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:19 IST

जिल्ह्यातील नागरिकांचा मुंबई, ठाणे, नाशिकशी नित्याचा संबंध,  वेळीच उपाययोजनांची गरज 

हितेन नाईकपालघर : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये देशातील टॉप-१० शहरांमधील मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमा पालघर जिल्ह्याला जोडल्या गेल्याने पालघर जिल्हा डेंझर झोनवर उभा आहे. जिल्ह्यातही वाढत्या कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच गंभीर उपाययोजना आखणे गरजेचे बनले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासन, रुग्णालये, विविध संस्थांनी पुढाकार घेतला असताना ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग या तीन ट्रीकचा गंभीरपणे वापर करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. विनाकाम बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात दिसून येत असून लग्नसमारंभ आणि येणाऱ्या सणाचे साजरीकरण उत्साहात करण्याचे फॅड कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने अजूनही कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनीही असल्या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर लॉकडाऊन, नोकऱ्या-रोजगारावर गदा, गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आदी मागच्या मार्चपासून सोसलेल्या हाल-अपेष्टांना पुन्हा सामोरे जाण्याची पाळी जिल्हावासीयांवर ओढवणार आहे.

आजही जिल्ह्यातील मोठा वर्ग नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्ताने मुंबईत जात असून ट्रेन, लोकलचा प्रवास करून जिल्ह्यात येत आहे. दुसरीकडे ठाणे येथून बस प्रवासाद्वारे जिल्ह्यात येणारा प्रवासीवर्ग मोठा आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला मृत्यू हा ठाणे येथून नोकरीनिमित्ताने उसरणी येथे आलेल्या एका तरुणाचा झाला होता. सध्या ठाण्यात दररोज कोरोनाबाधितांच्या आकडा हजारोच्या संख्येने वाढत आहे, तर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, खोडाळा या भागात शासकीय नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचारी, अधिकारी वर्गाची संख्या मोठी असून नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोना पालघर जिल्ह्याला मारक ठरू शकतो.

जिल्ह्यात कोरोना तपासणी मोहिमेची कडक अंमलबजावणी गरजेची बनली असून जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेले १९४ प्रतिबंधित क्षेत्र फक्त नावापुरती उरली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे तात्काळ आरटीपीसीआर चाचणी संख्या वाढवली असून कोरोनासदृश लक्षणे असलेल्या सर्व नागरिकांनी स्वतःहून पुढे येत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस