शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVirus News: वसई-विरारमध्ये २१,३९८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:43 IST

धास्तावलेल्या वसईकरांना दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

वसई/पारोळ : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच आता परिस्थितीत बदल होत आहे. मध्यंतरी कोरोनाचा वेग वाढण्याबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली होती, मात्र आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत तब्बल २१ हजार ३९८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे वसई-विरारकरांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार २३ हजार ६५४ रुग्ण आढळून आलेले आहेत.कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४६७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच या जीवघेण्या आजारातून २१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वसई-विरारमधील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा ठरला आहे.मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांचा वेग खूपच वाढला होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवसाला ४००-५०० बाधित रुग्ण आढळू लागल्याने सामाजिक संसर्गाचा धोका होता, परंतु आरोग्य यंत्रणेने पालिका हद्दीत रुग्ण आढळलेल्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, गेल्या महिनाभरात सुमारे ६ हजार २७६ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. दि. ५ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहर महापालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे महापालिकेतील रुग्णसंख्येचा वेग कमी होत आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने आनंद व्यक्त होत आहे. सध्या पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांमध्ये१ हजार ७८९ रुग्ण उपचार घेत आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांमध्ये निष्काळजीपालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कामधंद्यानिमित्त मुंबई-ठाणे परिसरात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने बाधित ठरले आहेत.जूनमध्ये वसई-विरार शहर महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वसईकर कामाधंद्यानिमित्त बाहेर पडले. पालिका प्रशासनाने सुरक्षा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करूनही नागरिक खबरदारी घेत नाहीत. विनामास्क भटकणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या