शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

CoronaVirus News: वसई-विरारमध्ये २१,३९८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:43 IST

धास्तावलेल्या वसईकरांना दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

वसई/पारोळ : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच आता परिस्थितीत बदल होत आहे. मध्यंतरी कोरोनाचा वेग वाढण्याबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली होती, मात्र आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत तब्बल २१ हजार ३९८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे वसई-विरारकरांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार २३ हजार ६५४ रुग्ण आढळून आलेले आहेत.कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४६७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच या जीवघेण्या आजारातून २१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वसई-विरारमधील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा ठरला आहे.मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांचा वेग खूपच वाढला होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवसाला ४००-५०० बाधित रुग्ण आढळू लागल्याने सामाजिक संसर्गाचा धोका होता, परंतु आरोग्य यंत्रणेने पालिका हद्दीत रुग्ण आढळलेल्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, गेल्या महिनाभरात सुमारे ६ हजार २७६ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. दि. ५ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहर महापालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे महापालिकेतील रुग्णसंख्येचा वेग कमी होत आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने आनंद व्यक्त होत आहे. सध्या पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांमध्ये१ हजार ७८९ रुग्ण उपचार घेत आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांमध्ये निष्काळजीपालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कामधंद्यानिमित्त मुंबई-ठाणे परिसरात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने बाधित ठरले आहेत.जूनमध्ये वसई-विरार शहर महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वसईकर कामाधंद्यानिमित्त बाहेर पडले. पालिका प्रशासनाने सुरक्षा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करूनही नागरिक खबरदारी घेत नाहीत. विनामास्क भटकणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या