शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वसई-विरारमध्ये २१,३९८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:43 IST

धास्तावलेल्या वसईकरांना दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

वसई/पारोळ : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच आता परिस्थितीत बदल होत आहे. मध्यंतरी कोरोनाचा वेग वाढण्याबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली होती, मात्र आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत तब्बल २१ हजार ३९८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे वसई-विरारकरांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार २३ हजार ६५४ रुग्ण आढळून आलेले आहेत.कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४६७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच या जीवघेण्या आजारातून २१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वसई-विरारमधील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा ठरला आहे.मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांचा वेग खूपच वाढला होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवसाला ४००-५०० बाधित रुग्ण आढळू लागल्याने सामाजिक संसर्गाचा धोका होता, परंतु आरोग्य यंत्रणेने पालिका हद्दीत रुग्ण आढळलेल्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, गेल्या महिनाभरात सुमारे ६ हजार २७६ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. दि. ५ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहर महापालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे महापालिकेतील रुग्णसंख्येचा वेग कमी होत आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने आनंद व्यक्त होत आहे. सध्या पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांमध्ये१ हजार ७८९ रुग्ण उपचार घेत आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांमध्ये निष्काळजीपालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कामधंद्यानिमित्त मुंबई-ठाणे परिसरात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने बाधित ठरले आहेत.जूनमध्ये वसई-विरार शहर महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वसईकर कामाधंद्यानिमित्त बाहेर पडले. पालिका प्रशासनाने सुरक्षा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करूनही नागरिक खबरदारी घेत नाहीत. विनामास्क भटकणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या