शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पालघरमधील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तीनशेहून जास्त; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:38 IST

रुग्णालयांत २७ जण घेताहेत उपचार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा मृत्यू झाला आहे

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय ठरत आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही पोलीस वालीव पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सद्य:स्थितीत पालघर जिल्हा पोलीस दलातील ३०१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून २७१ पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २७ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस गेले अनेक महिने अहोरात्र मेहनत घेत आहेत. तरीही जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पालघर जिल्हा पोलीस दलालाही त्याचा फटका बसला आहे. आतापर्यंत २५२ पोलिसांना इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन केले होते, त्या सर्वांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच ५८ अधिकारी आणि ६६० पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वांरटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ४९ अधिकारी आणि ६२३ पोलीस कर्मचारी कालावधी पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

कोविड सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनाही कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी वसईतील हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. कोरोना मुक्त झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. २००३ साली गेट वे आॅफ इंडिया आणि मुंबादेवी येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तपास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीममध्ये वनकोटी हे होते. त्यांनी या हल्ल्यातील आरोपींना पकडून सदर गुन्ह्याचा उलगडा केला होता.

पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्व अधिकाºयांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात दिली आहे. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना आखल्या आहेत. तर कोरोनातून बरे झालेले पोलीस पुन्हा कर्तव्यावरदेखील हजर झाले आहेत.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा मृत्यू झाला आहे. नऊ अधिकारी आणि ३७ पोलीस कर्मचारी अद्याप होम क्वांरटाइन आहेत. काही अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कुटुंबांनाही लागण झालेली आहे. ९६ कुटुंबांना उपचार झाल्यावर सोडण्यात आले असून २१ कुटुंबे अजून उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या