शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

CoronaVirus Lockdown News: वसई-विरारमध्ये व्यापाऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:45 IST

नालासोपाऱ्यातील दुकानदारांचा रास्तारोको : दुकाने सुरूच ठेवण्याचा दिला इशारा

नालासोपारा : राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा फटका अनेक व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांना बसत आहे. त्यामुळे नालासोपारा, वसई, विरार, नायगाव परिसरातील व्यापारी संघटना, दुकानदारांनी विरोध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी संतप्त व्यापारी, दुकानदारांनी नालासोपाऱ्यात रास्तारोको, विरार येथे पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.संतप्त व्यापाऱ्यांनी आम्ही दुकाने चालू ठेवणार असून किती गुन्हे दाखल करायचे तेवढे करा, आम्ही घाबरणार नसल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतप्त ७० ते ९० दुकानदार, व्यापाऱ्यांनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रोडवरील राधाकृष्ण हॉटेलसमोर अर्धा ते पाऊण तास रास्तारोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने एक ते दीड तास वाहतूककोंडी झाली होती. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी राज्य सरकारचा आदेश असल्याचे सांगून संतप्त दुकानदार, व्यापाऱ्यांना विनंती केल्यावर ते शांत झाले व वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान, बुधवारी अति आवश्यक सेवा देणारी दुकाने वगळून बाकी दुकाने बंद होती.विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या ठिकाणी असलेल्या दुकानदार, व्यापाऱ्यांनीही निषेध नोंदवला असून दुकाने चालू करणार असल्याची भूमिका घेतली आहे. नालासोपारा येथील कपडा व्यापारी, ज्वेलर्स व्यापारी, दुकानदार असे ६० ते ७० जण वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मंगळवारी दुपारी १ वाजता गेले होते. पण आयुक्तांनी भेटण्यास नकार दिल्यावर मुख्यालयाबाहेर निषेध नोंदवला. शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद ठेवून राज्य सरकारला सहकार्य करणार होतो. पण ३० एप्रिलपर्यंत दररोज दुकाने कशी काय बंद ठेवणार? दुकानांमुळे कोरोना पसरतो का?- जयेश माळी, कपडा व्यापारीनियमांची अंमलबजावणी करावीच लागेलराज्य सरकारने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावीच लागेल, असे सक्त आदेश असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. राज्य सरकारने सुरुवातीला सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. सरकारच्या नियमानुसार आम्ही शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्यास तयार होतो. शिवाय दुकानात येणारे ग्राहक मास्क, सॅनिटायझर अशा सगळ्याची अंमलबजावणी करतील, याचीही काळजी घेत होतो. मात्र कालपासून ३० एप्रिलपर्यंत दुकाने संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आम्हाला मान्य नाहीत. एक वेळ कोरोनाने आम्ही मरू; पण आमची बायका-मुले, नोकर-चाकर यांना उपाशी ठेवून मरणार नाही. त्यामुळे आम्ही या निर्बंधांचा निषेध करत असून; गुन्हे दाखल झाले तरी चालतील, दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.- बॉबीसिंग राजपुरोहित, अध्यक्ष, नालासोपारा कपडा व्यापारी असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या