शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संविधान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:02 IST

हजारो नागरिकांचा सहभाग

पालघर : राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मूक मोर्चा काढण्यात आल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात सोमवारी संविधान सन्मान मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येऊन नागरिकत्व संशोधन अधिनियमाला पाठिंबा दर्शवत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या वेळी ‘हल्ला बोल हल्ला बोल, नक्षलवाद पे हल्ला बोल, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत सन्मान संविधान मंचच्या वतीने पालघर सर्कस ग्राउंडमधून हजारोंच्या संख्येने निघालेल्या नागरिकांनी शहर दणाणून सोडले. या वेळी शहरातील बहुतांशी दुकाने बंद होती.या वेळी भाजपाचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सुधीर दांडेकर, उमेश गायकवाड, या संतोष जनाठे, बाबा कदम, मुकेश दुबे, नगरसेवक भावानंद संखे, अरुण माने, लक्ष्मीदेवी हजारी, भाजप जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, अरुण जैन आदी या रॅलीमध्ये उपस्थित होते. जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी न्या कायद्याला पाठिंबा दर्शविला. देशासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या आणि लोकसभा व राज्यसभा यांनी पारित केलेल्या व राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी दिलेल्या कायद्याचे आम्ही समर्थन करतो, असा जयघोष रॅलीमध्ये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे कलम ५१ ए नुसार संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था यांचा आदर करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे. संविधानाद्वारे स्थापित, संसदेने पारित केलेल्या सीएए कायद्याचे हिंसक विरोध करून पोलीस व प्रशासनावर दगडफेक करून सार्वजनिक संपत्ती नष्ट करणे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे या रॅलीत सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यात या कायद्याची त्वरित अंमलबजावणी करून घुसखोरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या रॅलीत करण्यात आली.प्रवाशांचे हालसकाळी १० वाजता रॅली निघणार असल्याने पालघर स्थानकातील एसटी बसेस, सहा आसनी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबई, गुजरात दिशेने जाणाऱ्या व येणाºया प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गावागावात रिक्षा व एसटीची वाट पाहत अनेक प्रवासी उभे होते. तर मुंबईवरून आलेल्या काही प्रवाशांना चालत थेट आपले केळवे गाव गाठावे लागले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक