शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

वसई-विरार शहरांमधील सुविधा सुधारण्याचा केला संकल्प; मूलभूत सेवा-सुविधांचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:23 IST

आगामी काळात महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी परिवहन विभागाची बससेवा देण्यासाठी योजना आखली जात आहे.

मंगेश कराळेनालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेने आरोग्य, परिवहन, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये २०२० साली सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या वर्षी महानगरपालिका नागरिकांच्या गरजेप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे मूलभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. मागील वर्षी महानगरपालिकेपर्यंत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल अधिकारी व कर्मचारी घेत असून ते आता तक्रारदारांपर्यंत पोहचत आहेत. यामध्ये खुद्द महापौर हेही सामील झाले असून वसई, विरार, नालासोपारा, नायगाव ही महानगरपालिकेच्या हद्दीमधील शहरे आणि गावे सुधारण्याचा संकल्पच केला असल्याची माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत करताना दिली.

महापौरांनी सांगितले की, मी स्वत: व्यक्तिगत वसई-विरार शहरांमधील गल्लीबोळात, चाळी आणि झोपडपट्टी परिसरात जाऊन तिथे असलेल्या सुविधांची माहिती घेत आहे. ज्या ठिकाणी असुविधा दिसून येत आहेत, त्या ठिकाणी लवकरात लवकर सुधार करून तेथील नागरिकांना सुविधा कशा उपलब्ध होतील याबाबत प्रयत्न करत आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते त्या परिसरात, रस्त्यावरील अतिक्र मणे, फेरीवाला झोन, रिक्षा स्टँड याचप्रमाणे यांच्याशी निगडित समस्यांवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी लवकरच या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी महापालिका काय प्रयत्न करीत आहे, असे विचारले असता महापौर प्रवीण शेट्टी म्हणाले की, वसई-विरारमधील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक व अत्यावश्यक उपकरणे लवकरच उपलब्ध केली जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये येणाºया रुग्णांची उत्तमपणे देखभाल केली जाईल. हॉस्पिटलमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध केले जाणार. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांचे पदे रिक्त आहेत ती पदे भरली जातील. आमचा प्रयत्न असणार आहे की, या ठिकाणी राहत असलेल्या रु ग्णांना मुंबई, ठाणे किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी जावे लागणार नाही. शहरातील रस्त्यावरील अतिक्र मणाबाबत विचारले असता महापौरा म्हणाले की, वसई तालुक्यातील रस्त्यांवर झालेल्या अतिक्र मणापासून लवकरच सुटका होणार आहे.फेरीवाल्यांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढणारवसई, नालासोपारा आणि विरार परिसरात सध्या फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. याविषयी महापौरांनी सांगितले की, फेरीवाल्यांनाही लवकरच त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध केली जाणार आहे. शहरातील वाहतुकीची सर्वात मोठी समस्या रिक्षा स्टँडमुळे होत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, विविध युनियनचे अध्यक्ष, समाजसेवक तसेच नागरिकांशी चर्चा केली जाणार आहे.परिवहन सेवा सुधारण्याबाबत महापालिका काय प्रयत्न करीत आहे, असे विचारले असता महापौर म्हणाले की, वसई-विरारमधील नागरिकांना परिवहन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आगामी काळात महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी परिवहन विभागाची बससेवा देण्यासाठी योजना आखली जात आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधून मदतीचे प्रयत्न करणार आहे.