शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

अनुकंपा भरती गैरव्यवहारातील दोषींवर दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:31 IST

जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती.

- हितेन नाईकपालघर -  जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे येत्या आॅक्टोबर महिन्यात या प्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करण्यास सुरु वात झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सर्वसाधारण सभेत बुधवारी जाहीर केले.पालघर जिल्हा निर्मिती नंतर ठाणे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीच्या यादी मधील २८ कर्मचाºयांच्या नेमणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये पालघर जिल्हा परिषदे कडून घाईघाईने करण्यात आल्याचे निदर्शनास येताना ठाणे जिल्हापरिषदेने मात्र अनुकंपा तत्वाच्या भरती करणे टाळले होते. दि.२१ फेब्रुवारी २०१७ ला या भरतीचा आदेश काढताना ज्या मंजूर टिपणीचा संदर्भ देण्यात आला त्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यकार्यकरी अधिकारी यांची स्वाक्षरीच नसल्याने फक्त संबंधित विभागातील लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांनीच हा भरतीचा निर्णय घेतल्याचे भासवीत उच्चपदस्थ अधिकाºयांना वाचिवण्याचा डाव खेळला जात होता.या भरतीद्वारे २८ कर्मचाºयांच्या नेमणुका करताना मोठा गैरव्यवहार झाल्याची बाब पाटील यांनी प्रथम सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आणली होती. त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी स्वत: चौकशी केली होती. परंतु कारवाईचे सत्र पुढे सरकले जात नसल्याने पुन्हा १२ जून च्या सर्वसाधारण सभेत हा विषय गाजला. त्यामुळे प्रकल्प संचालक माणिक दिवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांची एक चौकशी समिती नेमण्यास शासनाला भाग पडले होते.परंतु या गैरव्यवहाराचा अहवाल मात्र सादर केला जात नव्हता. दरम्यानच्या काळात निधी चौधरी यांची बदली मुंबई महानगर पालिकेत आणि या प्रकरणातील संशयाच्या घेºयात सापडलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांची बदली (अजूनही त्यांना नेमणूक दिलेली नाही) करण्यात आली होती.बुधवारच्या सर्वसाधारण सभेत या अहवालाचे वाचन होत सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचा ठराव पारित होईल अशी अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या बाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याने उपस्थित पदाधिकारी, सदस्यांनी आक्र मक भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनाला नमते घेत पुढच्या महिन्यापासून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिल्या नंतर सर्वसाधारण सभेतील वादळ काही अंशी शमले.अनुकंपा भरती प्रक्रि या पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी मी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कडे एक समिती नेमण्याबाबत सांगितले असता त्यांनी ऐकले नव्हते.- सुरेखा थेतले,माजी अध्यक्षा, जि. प. पालघरया भरती प्रक्रि येतील गैरव्यवहाराला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि उप मुख्यकार्यकारी प्रकाश देवऋषी जबाबदार असून जो पर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या