शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

रासायनिक कारखान्यांवर समितीचा वॉच

By admin | Updated: July 3, 2017 05:57 IST

तारापुर एमआयडीसी मधील सम्प नं ३ मध्ये चारशे मेट्रिक टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून, पावसाळ्या पूर्वी विल्हेवाट न

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापुर एमआयडीसी मधील सम्प नं ३ मध्ये चारशे मेट्रिक टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून, पावसाळ्या पूर्वी विल्हेवाट न लावल्यास प्रदूषणाची गंभीर समस्या हे ३० मे रोजी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ता नंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्लज विल्हेवाटीचे एमआयडीसीला दिलेले आदेश व इतर दाखल असलेल्या दाव्याची दखल घेवून पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिक कारखान्यांच्या तपासणीसाठी समितीची स्थापना पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे राष्ट्रीय हरित लवादाच्या ३० मेच्या आदेशा बरोबरच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांचे कडील दावा व प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे, यांचे कडील २९ एप्रिल २०१७ रोजीच्या अहवालानंतर पालघर जिल्ह्यात धोकादायक व रासायनिक कारखान्यामुळे पर्यावरणास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाल्याने पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.समितीच्या अध्यक्षपदावर पालघर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली असून सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई, कामगार उपायुक्त, पालघर, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर- १, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, प्राचार्य, सेंट जॉन कॉलेज पालघर, हे सर्व समितीचे सदस्य तर उपविभागीय अधिकारी पालघर विभाग, पालघर हे सदस्य सचिव म्हणून असणार आहेत समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येवून तिचा अहवाल जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक कारखाने व रासायनिक कारखाने यांची तपासणी करीता सदर समिती जिल्ह्यातील धोकादायक व रासायनिक कारखान्यांची यादी सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई यांचेकडून प्राप्त करून घेईल. त्याच प्रमाणे या तपासणी करणेसाठी सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई , कामगार उपायुक्त, पालघर व उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर -१ यांचेकडून माहिती प्राप्त करून सर्वंकष तपासणीचा नमुना तयार करणार आहे.या कामा करीता पथकाची उभारणी करण्यात येणार आहे. तपासणी झाल्या नंतर तात्काळ कार्यवाही करणेबाबत जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांना आदेश दिले जाणार आहेत.