शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रासायनिक कारखान्यांवर समितीचा वॉच

By admin | Updated: July 3, 2017 05:57 IST

तारापुर एमआयडीसी मधील सम्प नं ३ मध्ये चारशे मेट्रिक टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून, पावसाळ्या पूर्वी विल्हेवाट न

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापुर एमआयडीसी मधील सम्प नं ३ मध्ये चारशे मेट्रिक टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून, पावसाळ्या पूर्वी विल्हेवाट न लावल्यास प्रदूषणाची गंभीर समस्या हे ३० मे रोजी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ता नंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्लज विल्हेवाटीचे एमआयडीसीला दिलेले आदेश व इतर दाखल असलेल्या दाव्याची दखल घेवून पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिक कारखान्यांच्या तपासणीसाठी समितीची स्थापना पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे राष्ट्रीय हरित लवादाच्या ३० मेच्या आदेशा बरोबरच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांचे कडील दावा व प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे, यांचे कडील २९ एप्रिल २०१७ रोजीच्या अहवालानंतर पालघर जिल्ह्यात धोकादायक व रासायनिक कारखान्यामुळे पर्यावरणास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाल्याने पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.समितीच्या अध्यक्षपदावर पालघर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली असून सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई, कामगार उपायुक्त, पालघर, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर- १, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, प्राचार्य, सेंट जॉन कॉलेज पालघर, हे सर्व समितीचे सदस्य तर उपविभागीय अधिकारी पालघर विभाग, पालघर हे सदस्य सचिव म्हणून असणार आहेत समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येवून तिचा अहवाल जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक कारखाने व रासायनिक कारखाने यांची तपासणी करीता सदर समिती जिल्ह्यातील धोकादायक व रासायनिक कारखान्यांची यादी सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई यांचेकडून प्राप्त करून घेईल. त्याच प्रमाणे या तपासणी करणेसाठी सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई , कामगार उपायुक्त, पालघर व उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर -१ यांचेकडून माहिती प्राप्त करून सर्वंकष तपासणीचा नमुना तयार करणार आहे.या कामा करीता पथकाची उभारणी करण्यात येणार आहे. तपासणी झाल्या नंतर तात्काळ कार्यवाही करणेबाबत जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांना आदेश दिले जाणार आहेत.