शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दांडेकर महाविद्यालयात ‘कॉफी विथ व्ही.सी.’

By admin | Updated: January 15, 2017 05:08 IST

ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील गुणवत्तापूर्ण ज्ञानाचा उपयोग समाजाभिमुख

- हितेन नाईक,  पालघरग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील गुणवत्तापूर्ण ज्ञानाचा उपयोग समाजाभिमुख दृष्टिकोन रुजविण्यासाठी केला पाहीजे, असा संदेश मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘कॉफी विथ व्ही.सी.’ या कार्यक्र मात विद्यार्थ्यांना दिला.कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपला जीवन प्रवास उलगडून दाखवितांना आईवडीलांपेक्षा शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगून आपले करिअर घडविण्यासाठी त्यांचा आधार घेण्याचा सल्ला दिला. आपण शिक्षण घेत असताना नेमक्या कोणत्या संधींचा लाभ घ्यायला पाहिजे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करून आलेली संधी कधी दवडू नका असे सांगितले. स्वत:च्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.आयुष्यात मोठे होण्यासाठी प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात भेटणाऱ्या सर्व व्यक्तींकडून आपणास काहीतरी शिकणे शक्य आहे. याचे भान ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आयुष्य जगताना समाजाप्रती एक तळमळ असली पाहिजे. याचे भान प्रत्येक विद्यार्थ्यांने ठेवले पाहिजे, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करु न दिली. मुंबई विद्यापीठातर्फे ‘कॉफी विथ व्ही.सी.’ हा कार्यक्रम सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात काल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मास पालघर जिल्हयातील आणि विद्यापीठाच्या पश्चिम भागातील ६० महाविद्यालयातील २००० विद्यार्थी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. संजय देशमुख यांनी दिली.मधमाशीचे समर्पक उदाहरण : मधमाशी काटेरी आणि बिनकाटेरी अशा दोन्ही झाडांच्या फुलांमधून मध गोळा करीत असते. मधमाशीला एक ग्रॅम मध गोळा करण्यासाठी शेकडो झाडे धुंडाळावी लागतात. त्यामुळे आयुष्यात काही बनण्यासाठी मधमाशीसारखी मेहनत करायला आपण शिकले पाहिजे. शिक्षणाची कास धरतांना पदव्युतर शिक्षण पूर्ण करीत अशी उत्तुंग झेप घ्या की, ज्यामुळे तुमच्या आईवडीलांना व समाजाला तुमचा अभिमान वाटेल, तुमचे नशीब तुम्हालाच घडवावे लागेल, हे लक्षात ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न करा, असा ही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.देशातील पहिलाच उपक्रम१कॉफी विथ व्ही.सी. हा मुंबई विद्यापीठ तसेच देशातील अशा प्रकारचा एक वेगळया स्वरु पाचा पहिलाच उपक्र म कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. ज्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ७५० पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद होणार आहे.२पालघर जिल्ह्यासाठी दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्र मात ६० महाविद्यालयातील २००० विद्यार्थ्यांचा सहभाग. अविरतपणे साडेतीन तासापेक्षा जास्त वेळ विद्यार्थ्यांशी संवाद, विद्यार्थी मंत्रमुग्धतेने त्याचा आनंद घेत होते. विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तळमळीने आवाहन केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून घेत विद्यार्थ्यांशी मनमोकळा अनौपचारिक संवादही साधला.