शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दांडेकर महाविद्यालयात ‘कॉफी विथ व्ही.सी.’

By admin | Updated: January 15, 2017 05:08 IST

ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील गुणवत्तापूर्ण ज्ञानाचा उपयोग समाजाभिमुख

- हितेन नाईक,  पालघरग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील गुणवत्तापूर्ण ज्ञानाचा उपयोग समाजाभिमुख दृष्टिकोन रुजविण्यासाठी केला पाहीजे, असा संदेश मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘कॉफी विथ व्ही.सी.’ या कार्यक्र मात विद्यार्थ्यांना दिला.कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपला जीवन प्रवास उलगडून दाखवितांना आईवडीलांपेक्षा शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगून आपले करिअर घडविण्यासाठी त्यांचा आधार घेण्याचा सल्ला दिला. आपण शिक्षण घेत असताना नेमक्या कोणत्या संधींचा लाभ घ्यायला पाहिजे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करून आलेली संधी कधी दवडू नका असे सांगितले. स्वत:च्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.आयुष्यात मोठे होण्यासाठी प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात भेटणाऱ्या सर्व व्यक्तींकडून आपणास काहीतरी शिकणे शक्य आहे. याचे भान ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आयुष्य जगताना समाजाप्रती एक तळमळ असली पाहिजे. याचे भान प्रत्येक विद्यार्थ्यांने ठेवले पाहिजे, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करु न दिली. मुंबई विद्यापीठातर्फे ‘कॉफी विथ व्ही.सी.’ हा कार्यक्रम सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात काल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मास पालघर जिल्हयातील आणि विद्यापीठाच्या पश्चिम भागातील ६० महाविद्यालयातील २००० विद्यार्थी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. संजय देशमुख यांनी दिली.मधमाशीचे समर्पक उदाहरण : मधमाशी काटेरी आणि बिनकाटेरी अशा दोन्ही झाडांच्या फुलांमधून मध गोळा करीत असते. मधमाशीला एक ग्रॅम मध गोळा करण्यासाठी शेकडो झाडे धुंडाळावी लागतात. त्यामुळे आयुष्यात काही बनण्यासाठी मधमाशीसारखी मेहनत करायला आपण शिकले पाहिजे. शिक्षणाची कास धरतांना पदव्युतर शिक्षण पूर्ण करीत अशी उत्तुंग झेप घ्या की, ज्यामुळे तुमच्या आईवडीलांना व समाजाला तुमचा अभिमान वाटेल, तुमचे नशीब तुम्हालाच घडवावे लागेल, हे लक्षात ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न करा, असा ही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.देशातील पहिलाच उपक्रम१कॉफी विथ व्ही.सी. हा मुंबई विद्यापीठ तसेच देशातील अशा प्रकारचा एक वेगळया स्वरु पाचा पहिलाच उपक्र म कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. ज्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ७५० पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद होणार आहे.२पालघर जिल्ह्यासाठी दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्र मात ६० महाविद्यालयातील २००० विद्यार्थ्यांचा सहभाग. अविरतपणे साडेतीन तासापेक्षा जास्त वेळ विद्यार्थ्यांशी संवाद, विद्यार्थी मंत्रमुग्धतेने त्याचा आनंद घेत होते. विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तळमळीने आवाहन केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून घेत विद्यार्थ्यांशी मनमोकळा अनौपचारिक संवादही साधला.