शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

कोकाकोलाच्या उपशाने वाड्याला कोरड

By admin | Updated: May 24, 2016 02:36 IST

वाडा तालुक्यातील कुडूस येथील कोका-कोला ही कंपनी वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीतील बंधाऱ्यातून पाणी उपसा करत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर डोहातील

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस येथील कोका-कोला ही कंपनी वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीतील बंधाऱ्यातून पाणी उपसा करत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर डोहातील पाणीसाठा आडल्याने पाणीटंचाई निर्माण होऊन शहरवासियांच्या घशाला कोरड पडली आहे.वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधकाऱ्यातून वाडा शहराला पाणीपुरवठा केला जातो. याच नदीवर गांध्रे गावालगत असलेल्या बंधाऱ्यातून कोका-कोला कंपनी दररोज लाखो लिटर पाणी उपसते. त्यामुळे भूगर्भातील स्त्रोतातून पाणी वाहून गेल्याने सिद्धेश्वर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावते आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिल नंतर वाडा शहराला पाणीटंचाई भेडसावते. या स्थितीत वाडा शहरात कमी दाबाने व अल्पकाळ पाणीपुरवठा केल्याने शहरातील विविध नगरांमध्ये भीषण पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कोका-कोलाने मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा केल्याने सिद्धेश्वर बंधाऱ्यातीली पाणीपातळी प्रचंड खालावली असून पुढील दहा दिवसही हा पाणीसाठा पुरेल की नाही अशी शंका आहे. वाडा शहर हे दिवसेंदिवस विस्तारत असून अनेक नगरे नव्याने वसत आहेत. पाणीसाठा कमी झाल्याने शहरातील नगरांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे. शहरातील शिवाजीनगर, विनेकनगर, सोनारपाडा, विष्ण्ूनगर आदी भागात केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करता-करता ग्रामपंचायतीच्या तोंडचे पाणी पळाले आहे.उपसरपंच रोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोका कोलाच्या प्रचंड उपशामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली असून शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. कोका कोला ज्या बंधाऱ्यातून पाणी उचलते त्यातून वाडा शहराला पाणी मिळावे, अशी मागणी शासनाकडे केल्याचे सांगितले. (वार्ताहर)