शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लिपीक परीक्षा नव्याने नाही

By admin | Updated: October 22, 2015 00:07 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक तसेच टंकलेखकपदांच्या परीक्षेत दुसऱ्यांदा मोबाइलद्वारे कॉपी झाल्याचे निष्पन्न झाले.

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक तसेच टंकलेखकपदांच्या परीक्षेत दुसऱ्यांदा मोबाइलद्वारे कॉपी झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची सायबर क्राइम ब्रँचकडून तपासणी करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, ही ओबीसी हक्क परिषदेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक व टंकलेखकपदांच्या १३४ जागांसाठी प्रथम ४ आॅक्टोबरला झालेल्या परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही परीक्षा रद्द करून पुन्हा १८ आॅक्टोबर रोजी फेरपरीक्षा घेतली. या परीक्षेमध्येही दोन परीक्षार्थ्यांजवळ मोबाइल सापडल्याने तर दोन विद्यार्थ्यांजवळ कॉपी सापडल्याने एकूण चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कमकुवत प्रशासकीय व्यवस्थेचे हे उदाहरण असल्याची टीका हक्क परिषदेने केली होती. दोन्ही परीक्षांदरम्यान झालेल्या पेपरफुटी प्रकरणातील परीक्षार्थी आरोपी हे पालघर जिल्हाबाह्य असल्याचे ठळकपणे दर्शवित पालघर जिल्ह्यातील कार्यालय भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनाच स्थान द्यावे, या मागणीवरही हक्क परिषद ठाम असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)दोषींवर कारवाई करातलाठी भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील उमेदवारांनी परीक्षा दिली असली तरी न्यायालयाच्या आदेशानुसार भरती प्रक्रिया राबविली जावी, दोषींवर कारवाई झाल्याखेरीज नवीन जिल्हा भरती प्रक्रिया करू नये, नवीन भरती प्रक्रियेत स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, पेपरफुटी प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन रोहित पाटील, अ‍ॅड. विलास पाटील, अभय पावडे इ.नी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.ओबीसी परिषदेची मागणीओबीसी हक्क परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली. ही मागणी फेटाळत दोन्ही परीक्षार्थ्यांकडील मोबाइल आणि कॉपी या परीक्षेच्या सुरुवातीलाच सापडल्याचे सांगून पेपरफुटी झालीच नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची आवश्यकता नसल्याचेही सांगितले. तसेच यापुढे भरती प्रक्रियेनंतरही रुजू झालेला परीक्षार्थी हा या पेपरफुटी रॅकेटमध्ये दोषी आढळल्यास त्याची भरती रद्द करून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.