शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:50 IST

वाडा तालुक्यातील प्रकार : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण विभागाविरोधात धरणे

वाडा : तालुक्यातील मानिवली येथील प्रल्हाद शिक्षण मंडळाच्या बबनराव गणपत पाटील माध्यमिक विद्यालयाच्या जवळपास ५४ विद्यार्थ्यांच्या शालांत परीक्षेचा निकाल अद्याप न मिळाल्याने त्यांचे शैक्षणकि नुकसान होत असून वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी तसेच पालकांना भेडसावते आहे. हा निकाल त्वरित देण्याची मागणी त्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे. या मागणीसाठी सोमवारी आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील मानिवली येथे बबनराव गणपत पाटील माध्यमिक विद्यालय असून २०१६ - १७ मध्ये या शाळेची स्थापना झाली. दरवर्षी या विद्यालयातून नववी आणि दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, या शाळेस शासकीय मान्यता नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमधून परीक्षेस बसवले जाते. यंदाही ५४ विद्यार्थ्यांना विक्र मगड तालुक्यातील साखरे येथील विद्यालयातून परिक्षेस बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क संस्थेकडे जमा देखील केले होते. मात्र संस्था चालकांनी हे शुल्क परिक्षा मंडळाकडे न भरल्याने त्यांचे निकाल रोखण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी पूनम बरफ, वैष्णवी वाघ आणि पालकांनी केला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी धरणे आंदोलन केले.संस्थेने परीक्षा मंडळाकडे विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने त्यांचा निकाल राखून ठेवल्याचे संस्थेचे विश्वस्त संतोष साठे यांच्याकडून मला समजले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसून त्यांचा निकाल आल्यानंतर दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाईल. - जयवंत खोत,गटशिक्षणाधिकारी, वाडा पंचायत समिती शिक्षण विभागविद्यार्थ्यांची अतीविलंब फी ४ लाख ६१ हजार न भरल्याने बोर्डाने निकाल रोखून धरले आहेत. संस्थेने शाळा बंद केली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येत्या पंधरा दिवसांत निकाल प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.- संतोष साठे, विश्वस्त, प्रल्हाद शिक्षण मंडळ

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल