शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

पालघर जिल्ह्यामधील नागरिक पुढील चार आठवडे उकाड्यामुळे होणार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:48 IST

कमाल तापमान राहणार सरासरीपेक्षा जास्त : शेतकऱ्यांनी स्वतःसह पशुधनाची काळजी घेण्याची गरज, कृषी हवामान शास्त्रज्ञांचा सल्ला

अनिरुद्ध पाटील  बोर्डी : भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील चार आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे उष्णता अधिक वाढणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली. दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी तापमान ३७.२ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले.

तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी शक्यतो संध्याकाळी द्यावे. उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशापासून आंब्याच्या बुंध्याचे संरक्षण करण्यासाठी खोडावर बोर्डोपेस्ट लावावी तसेच झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपई यांसारख्या फळांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी बॅगिंग किंवा स्कर्टिंग करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता त्यांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी त्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. कुक्कुटपालन शेडच्या बाजूने बारदाने लावून त्यावर सतत पाणी शिंपडावे तसेच छतावर गवत पसरावे.  त्यामुळे आतील तापमान कमी होण्यास मदत होईल. उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात