शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

पालघर जिल्ह्यामधील नागरिक पुढील चार आठवडे उकाड्यामुळे होणार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:48 IST

कमाल तापमान राहणार सरासरीपेक्षा जास्त : शेतकऱ्यांनी स्वतःसह पशुधनाची काळजी घेण्याची गरज, कृषी हवामान शास्त्रज्ञांचा सल्ला

अनिरुद्ध पाटील  बोर्डी : भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील चार आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे उष्णता अधिक वाढणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली. दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी तापमान ३७.२ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले.

तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी शक्यतो संध्याकाळी द्यावे. उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशापासून आंब्याच्या बुंध्याचे संरक्षण करण्यासाठी खोडावर बोर्डोपेस्ट लावावी तसेच झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपई यांसारख्या फळांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी बॅगिंग किंवा स्कर्टिंग करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता त्यांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी त्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. कुक्कुटपालन शेडच्या बाजूने बारदाने लावून त्यावर सतत पाणी शिंपडावे तसेच छतावर गवत पसरावे.  त्यामुळे आतील तापमान कमी होण्यास मदत होईल. उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात