शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खाडीपुलाचे काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:23 IST

आता झोपड्यांचा अडथळा : पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे स्थानिकांची उत्कंठा आणि संताप

पारोळ : रडतखडत सुरू असलेल्या नायगाव खाडी पुलाचे काम पुन्हा ठप्प झाल्याने नायगाव परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा अडथळ्यांचा सामना करत सुरू असलेल्या पुलाच्या कामात काही ना काही अडथळ्यांचा खोडा येत असल्याने हा पुल कधी पूर्ण होणार,असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाची उदासीन भूमिका तसेच कंत्राटदाराकडून पुलाच्या कामात सुरू असलेला कासवछाप कारभार नागरिकांच्या संतापाला खतपाणी घालू लागला आहे. याआधी असलेल्या अडथळ्यांचा सामना करत असलेल्या नायगाव खाडीपुलाच्या उतारकामात आता येथील झोपड्यांचा नवा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे लॉकडाऊन काळात सुरू झालेल्या पुलाचे अर्धवट काम पुन्हा एकदा ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नायगाव खाडी पुुलाच्या पश्चिम बाजूस असलेल्या फेरीवाल्यांच्या झोपड्या हटवण्यावरून जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांचा वाद झाला आहे. या शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला पाहिजे आहे. याबाबत पीडब्ल्यूडी प्रशासनाने महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागास सदर शेतकºयांना मोबदला मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. नायगाव खाडी पुलाच्या बाबतीत मागील ५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे नागरिकांची उत्कंठा वाढली आहे. पूल कधी सुरू होईल यासाठी नागरिक संभ्रमात आहेत. मध्यंतरी कोरोना आपत्तीमुळे खाडीपुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र जून महिन्यात वसई-विरार महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या खाडीपुलाच्या कामालाही सुरुवात करण्याच्या हालचाली पीडब्ल्यूडी प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊन शिथिल असतानाही खाडीपुलाचे काम पुन्हा एकदा ठप्प करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेने दिला एक कोटीचा निधीवसई-विरार महापालिकेने या पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजारांचा निधी दिला आहे. मात्र निधी देऊनही पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुलाचे काम रेंगाळल्यानंतर महापालिका प्रभाग समिती ‘जी’चे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेले नाही तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कन्हैया भोईर यांनी दिला आहे. 

टॅग्स :vasai-acवसई