शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

नायगाव खाडीपुलाचे काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:23 IST

आता झोपड्यांचा अडथळा : पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे स्थानिकांची उत्कंठा आणि संताप

पारोळ : रडतखडत सुरू असलेल्या नायगाव खाडी पुलाचे काम पुन्हा ठप्प झाल्याने नायगाव परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा अडथळ्यांचा सामना करत सुरू असलेल्या पुलाच्या कामात काही ना काही अडथळ्यांचा खोडा येत असल्याने हा पुल कधी पूर्ण होणार,असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाची उदासीन भूमिका तसेच कंत्राटदाराकडून पुलाच्या कामात सुरू असलेला कासवछाप कारभार नागरिकांच्या संतापाला खतपाणी घालू लागला आहे. याआधी असलेल्या अडथळ्यांचा सामना करत असलेल्या नायगाव खाडीपुलाच्या उतारकामात आता येथील झोपड्यांचा नवा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे लॉकडाऊन काळात सुरू झालेल्या पुलाचे अर्धवट काम पुन्हा एकदा ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नायगाव खाडी पुुलाच्या पश्चिम बाजूस असलेल्या फेरीवाल्यांच्या झोपड्या हटवण्यावरून जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांचा वाद झाला आहे. या शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला पाहिजे आहे. याबाबत पीडब्ल्यूडी प्रशासनाने महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागास सदर शेतकºयांना मोबदला मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. नायगाव खाडी पुलाच्या बाबतीत मागील ५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे नागरिकांची उत्कंठा वाढली आहे. पूल कधी सुरू होईल यासाठी नागरिक संभ्रमात आहेत. मध्यंतरी कोरोना आपत्तीमुळे खाडीपुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र जून महिन्यात वसई-विरार महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या खाडीपुलाच्या कामालाही सुरुवात करण्याच्या हालचाली पीडब्ल्यूडी प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊन शिथिल असतानाही खाडीपुलाचे काम पुन्हा एकदा ठप्प करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेने दिला एक कोटीचा निधीवसई-विरार महापालिकेने या पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजारांचा निधी दिला आहे. मात्र निधी देऊनही पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुलाचे काम रेंगाळल्यानंतर महापालिका प्रभाग समिती ‘जी’चे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेले नाही तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कन्हैया भोईर यांनी दिला आहे. 

टॅग्स :vasai-acवसई