शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चुरशीच्या लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:26 IST

सोमवारी या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीचा हा शेवटचा दिवस आहे.

पालघर : सोमवारी या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणा विरूध्द कोण दंड थोपटणार याचाही फैैसला होणार आहे. या मतदारसंघात जरी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असते तरी त्यापैैकी प्रमुख उमेदवार रिंगणातच राहण्याची शक्यता आहे.शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा, काँग्रेसतर्फे दामू शिंगडा, भाजपातर्फे राजेंद्र गावीत, बविआतर्फे बळीराम जाधव आणि डाव्या पक्षांतर्फे किरण गेहला असे उमेदवार रिंगणात आहेत. अन्य उमेदवार हे अपक्ष कि ंवा चिल्लर पक्षांचे आहेत त्यामुळे अंतीम लढत वनगा, शिंगडा, गावीत, जाधव, गेहला यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत.डाव्या पक्षांचा उमेदवार या मतदारसंघात विजयी होत नसला तरी तो मोठी मते खाऊन जया पराजयाचे पारडे झुकविण्यास कारणीभूत ठरत असतो हा इतिहास आहे. हे ध्यानी घेता लढत वनगा, शिंगडा, गावीत, जाधव अशी चौरंगी होण्याची शक्यता आहे.राष्टÑवादीने या निवडणूकीत उमेदवार उभा केलेला नाही तो काँग्रेसला पाठिंबा देईल अशीच शक्यता आहे. श्रमजीवीने आपली भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाही ती जाहीर झाल्यानंतर तिचाही परिणाम मतदानावर बऱ्याचअंशी होऊ शकतो. कडेगाव पलुसमध्ये आम्ही उमेदवार उभा केलेला नाही, हे लक्षात घ्या व पालघरमधून उमेदवार मागे घेऊन भंडारा गोंदियात पाठिंबा घ्या, असा प्रस्ताव शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे. त्याचाही फैसला सोमवारी होण्याची शक्यता आहे.