शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

घोलवडच्या जयप्रकाश बारी वाड्यातील चिमणीवालं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:15 IST

घराला घरपण देणारा ठेवा : पाहुण्यांकडून कौतुक

बोर्डी : या गावच्या टोकेपाडा येथील बारी वाड्यातील जयप्रकाश बारी यांच्या घराच्या ओटीवर रोज सायंकाळी शेकडो चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. त्याचे स्थानिकांना अप्रूप नसलं तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांकडून विचारणा होऊन कौतुक होत असल्याचं बारी यांच म्हणणे आहे.

या गावच्या टोकेपाडा येथे डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर जयप्रकाश आणि अर्चना बारी या दाम्पत्यांचं घर आहे. हे सर्वसामान्य मध्यम वर्गीयांप्रमाणेच घर असलं, तरी येथे रोज सायंकाळी शेकडो चिमण्यांचा गोतावळा जमत असल्याने त्याला असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी कागदाच्या बॉक्सला चिमण्यांना आतबाहेर जाता यावे, म्हणून जागा ठेवली आणि त्याला दोरी बांधून घराच्या वेगवेगळ्या भागात टांगून ठेवले. मात्र साप आणि मांजरीपासून त्याचे संरक्षण होईल याची विशेष काळजी घेतली. त्यानंतर त्यामध्ये दाणे आणि पाणी ठेवण्याचे काम त्यांची हर्ष व राशी ही दोन मुलं व पत्नी अर्चना यांना सुलभतेने करता येईल हे देखील पाहिले. शिवाय रोजच्या धकाधकीच्या जीवनातून सायंकाळची वेळ ते चिमण्यांना दाणे टाकण्याकरिता आवर्जून देतात. त्यांचा लळा चिमण्यांनाही लागला असून तिन्ही सांजेला ते ओटीवर दाणे घेऊन आल्यावर त्या भुर्रकन येऊन दाणे वेचायला येतात.

हा क्षण दिवसभराचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी लाभदायक असल्याचे ते म्हणतात. तर दाणे वेचून झाल्यावर अंधार पडताच लगतच्या झाडावर त्या डेरेदाखल होतात. हा प्रकार रोज सुरू असतो. त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्याचे विशेष अप्रुप असून त्या बद्दल बारी कुटुंबियांचे विशेष कौतुक त्यांच्याकडून केले जाते. शिवाय घर किती मोठे वा सोयी सुविधांनी युक्त असण्यापेक्षा असा ठेवा असावा म्हणून त्यांना विशेष शाबासकी मिळते. तर जागतिक चिमणी दिनी त्यांना स्नेह्यांनी फोन करून शुभेच्छाही दिल्या.

अर्चना बारी या घोलवड येथील अंगणवाडी केंद्रात सेविका आहेत. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे केंद्रातील बालकांना त्या चिऊकावूच्या गोष्टी आणि गाणी ऐकवतात. मात्र घरचा समृद्ध करणाºया अनुभवाच्या गोष्टीतून या लहानग्यांच्या मनावर संस्कार करण्याचे काम त्या सुंदररित्या करीत आहेत. दरम्यान या परिसरात झाडांची संख्या, शेती व बागायती असून मोबाईल टॉवर नसल्याने चिमण्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. हा वारसा टिकवायचा असल्यास टॉवर हद्दपार झाले पाहिजेत असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. 

रोज सायंकाळी चिमण्यांना अंगणात दाणे टाकले जायचे, आता त्या थेट ओटीवरच येतात. ही संख्या झपाट्याने वाढत असून समृद्ध करणारा अनुभव आहे.-जयप्रकाश बारी (घोलवड ग्रामस्थ)