शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मुलांना पोषण आहारच नाही

By admin | Updated: August 6, 2015 23:27 IST

शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या ठेकेदारातर्फे होणारा पोषण आहाराचा

सुरेश काटे, तलासरीशाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या ठेकेदारातर्फे होणारा पोषण आहाराचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी दोन महिन्यांपासून आहारापासून वंचित आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. तलासरी तालुक्याच्या पटसंख्येनुसार फेडरेशनकडे पोषण आहाराची मागणी केली जाते. इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी १०० ग्रॅम तर इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी १५० ग्रॅम असा पुरवठा होतो. यानुसार, तलासरी शिक्षण विभागाने महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कन्झ्युमर फेडरेशनकडे तांदूळ १३००२२ किलो, मूगडाळ/मसूरडाळ ८६२५ किलो, तूरडाळ ८६२५ किलो, तेल ६५४६.५० किलो, मिरची १३४३ किलो, हरभरा-चवळी-मटकी ८६२५ किलो, मसाला १३४२.५० किलो, मीठ १३४३ किलो, जिरे ४३० किलो, मोहरी ४३० किलो, हळद ४३० किलो अशी मागणी जून, जुलै, आॅगस्टसाठी करण्यात आली. परंतु, १५ जूनला शाळा सुरू होऊन आज पावणे दोन महिने झाले, परंतु अजूनपर्यंत पोषण आहाराचा पुरवठा झाला नसताना अधिकारी अनभिज्ञ आहेत. गेल्या आर्थिक वर्षातही फेडरेशनकडून २८ हजार किलो तांदळाचा पुरवठा कमी करण्यात आला होता. तसेच तलासरी तालुक्याला या सामग्रीचा पुरवठा करणारा ठेकेदार त्याची काळ्याबाजारात विक्री करताना पकडण्यात आला होता. फेडरेशनकडून अनियमित पुरवठा करण्यात येत असल्याने आदिवासी विद्यार्थी वंचित राहत आहेत. परंतु, आर्थिक लागेबांधे असल्यामुळे फेडरेशनच्या पुरवठादारावर कारवाई करण्यात येत नाही. अच्छे दिनच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तरी यात लक्ष घालावे, अशी मागणी आदिवासी मुलांच्या पालकांनी केली आहे.