शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

चिकूचे उत्पादन घटले , रमजानमध्ये मागणी वाढल्याने दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:59 IST

गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे या हंगामातील चिकू उत्पादन कमालीचे घटले आहे. दरम्यान, बाजारात फळाला मागणी आणि दर चढा असतांना झाडावर फळच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे या हंगामातील चिकू उत्पादन कमालीचे घटले आहे. दरम्यान, बाजारात फळाला मागणी आणि दर चढा असतांना झाडावर फळच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.सध्या रमजान सुरू असून चिकूला मोठी मागणी आहे. प्रतवारीनुसार पहिल्या दर्जाच्या फळाला ४० रुपये प्रतिकिलो दर असून दुसºया आणि तिसºया दर्जाचे दर २० ते २५ आणि १० ते १५ एवढे आहेत. मात्र, झाडाला फळच नसल्याने शेतकºयांवर कठीण प्रसंग ओढाळवला आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. शिवाय सलग तीन ते चार दिवस आर्द्रता ही सव्वाशेच्या सुमारास होती. त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडण्यासह कळ्या आणि छोट्या फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे मे तसेच जून महिन्यात येणाºया उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास या हंगामात प्रतिदिन सुमारे १२५ ते १० टन माल (अंदाजे १२ ते १५ ट्रक) मालाची निर्यात होत होती. परंतु तालुक्यात साडेतीनहजार हेक्टर क्षेत्रावर चिकू असतांना या वेळी ही निर्यात जेमतेम ४५ ते ५० टन एवढीच आहे. काही बागायतींमध्ये तर झाडाला फळच नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादन संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी लोकमतला दिली.महिना बरकतीचा पण झाडांवर फळेच नाहीदरम्यान, या फळात प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने रमजान या उपवासाच्या काळात मुस्लिम धर्मियांकडून चिकूला अधिक पसंती दिली जाते. तथापी बाजारात मागणी जास्त आणि चढे दर असतात. त्यामुळे महागाईच्या काळातही उत्पादन खर्चाची सरासरी भरून निघण्यास हा महिना शेतकºयांकरिता लाभदायक ठरतो.या वेळी परिस्थिती विरोधाभास असल्याने त्याचा कोणताही लाभ यंदा बागायतदारांना होणार नाही अशी प्रामाणिक खंत बागायतदारांनी लोकमतकडे बोलून दाखवली व भरपाईची मागणीही केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार