शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चिकू बागायतदारांना पीकविम्याची प्रतिक्षा; कंपनी व बँकेची हलगर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:15 IST

खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदारांना विम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अनेक बागायतदारांना पीक विम्याचा लाभ मिळाला.

शौकत शेख डहाणू : विमा कंपनी आणि राष्ट्रीयीकृत बँकांचा हलगर्जीपणामुळे डहाणू तालुक्यातील जवळपास ४० चिकू बागायतदारांना पीक विमा योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत. बँकेकडून पोर्टलमध्ये शेतकऱ्यांची माहिती न भरण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याची प्रतिक्रिया बागायतदार शेतकºयांंकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चिकू पिकाला पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत कमाल दहा दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्राता राहिल्यास शंभर टक्के व किमान पाच दिवस राहिल्यास ५० टक्के नुकसानभरपाई विमा कंपनीने द्यावी, अशा अटीवर २०१८ मधील खरीप हंगामात टाटा एआयजी या विमा कंपनीकडे पीक विम्याची जबाबदारी देण्यात आली होती. ३० जूनपूर्वी बागायतदारांनी पाच टक्के रक्कम जमा करून विम्याचे अर्ज दाखल करावेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर डहाणू तालुक्यातील ३२ बागायतदारांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या डहाणू शाखेत प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार बागायतदारांच्या खात्यातून २,६४,९९४ रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून वसूल करण्यात आली. खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदारांना विम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अनेक बागायतदारांना पीक विम्याचा लाभ मिळाला.

मात्र, डहाणू येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या हलगर्जीपणामुळे २२ बागायतदार विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डहाणू, टाटा विमा कंपनी आणि कृषी विभागप्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची बागायतदारांची तक्र ार आहे.