शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 1, 2015 23:50 IST

पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील

वसई : पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन बदलांनुसार, शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्यामध्ये ३ टक्क्यांनी कपात होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना ३.५ ते ८ टक्क्यांपर्यंत पीक विमा योजनेचे हप्ते भरावे लागत आहेत.ग्रामीण भागातील शेतीला संजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता. तसेच त्यातील उंबरठा पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळणे कठीण झाले होते. याबाबत, तत्कालीन कृषिमंत्री केळवे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता लोकमतने या संवेदनशील प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी खात्याने नव्या राष्ट्रीय पीक योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांना कमीतकमी हप्ते भरावे लागणार आहेत. या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्यादेखील विमा उतरवू शकतात. आगामी रब्बी हंगामात ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)