शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 1, 2015 23:50 IST

पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील

वसई : पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन बदलांनुसार, शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्यामध्ये ३ टक्क्यांनी कपात होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना ३.५ ते ८ टक्क्यांपर्यंत पीक विमा योजनेचे हप्ते भरावे लागत आहेत.ग्रामीण भागातील शेतीला संजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता. तसेच त्यातील उंबरठा पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळणे कठीण झाले होते. याबाबत, तत्कालीन कृषिमंत्री केळवे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता लोकमतने या संवेदनशील प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी खात्याने नव्या राष्ट्रीय पीक योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांना कमीतकमी हप्ते भरावे लागणार आहेत. या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्यादेखील विमा उतरवू शकतात. आगामी रब्बी हंगामात ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)