शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 1, 2015 23:50 IST

पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील

वसई : पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन बदलांनुसार, शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्यामध्ये ३ टक्क्यांनी कपात होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना ३.५ ते ८ टक्क्यांपर्यंत पीक विमा योजनेचे हप्ते भरावे लागत आहेत.ग्रामीण भागातील शेतीला संजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता. तसेच त्यातील उंबरठा पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळणे कठीण झाले होते. याबाबत, तत्कालीन कृषिमंत्री केळवे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता लोकमतने या संवेदनशील प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी खात्याने नव्या राष्ट्रीय पीक योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांना कमीतकमी हप्ते भरावे लागणार आहेत. या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्यादेखील विमा उतरवू शकतात. आगामी रब्बी हंगामात ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)