शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 1, 2015 23:50 IST

पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील

वसई : पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन बदलांनुसार, शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्यामध्ये ३ टक्क्यांनी कपात होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना ३.५ ते ८ टक्क्यांपर्यंत पीक विमा योजनेचे हप्ते भरावे लागत आहेत.ग्रामीण भागातील शेतीला संजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता. तसेच त्यातील उंबरठा पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळणे कठीण झाले होते. याबाबत, तत्कालीन कृषिमंत्री केळवे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता लोकमतने या संवेदनशील प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी खात्याने नव्या राष्ट्रीय पीक योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांना कमीतकमी हप्ते भरावे लागणार आहेत. या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्यादेखील विमा उतरवू शकतात. आगामी रब्बी हंगामात ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)