शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

डहाणूतील दररोजचा १२ टन कचरा पालिकेसाठी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:34 IST

५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो.

शौकत शेखडहाणू : ५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो. मात्र डहाणूचा डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेले भाजपचे नगराध्यक्ष हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात याकडे रहिवासी डोळे लाऊन बसले आहेत.डहाणू नगरपरिषद स्थापन होऊन ३२ वर्षे होत आहेत. या कालावधीत बारा मुख्याधिकारी येथे येऊन गेले. मात्र, अद्याप डहाणू नगर परिषदेला शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत: च्या मालकीचे डिम्पंग ग्राऊंड निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे शहरात दररोज साठणारा १२ टन कचरा कुठे टाकावा, अशी गंभीर समस्या नगरपालिका प्रशासनापुढे उभी राहिली आहे.पर्यायान सध्यास्थीतीत लोणपाडा, सरावली येथे उघड्यावर कचरा डंप केला जात आहे. मात्र, त्यामुळे रहिवासी वस्ती त्रस्त झाल्याने नागरिकांकडून तक्र ारीचा सुर निघत आहे. कचºयामुळे दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे.डहाणूचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने डहाणू ग्रामपंचायतीचे १९८५ मध्ये पालिकेत रूपांतर केले. राज्यात शेती बागायती, चिकूची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर स्वच्छेच्याबाबतीत अस्वच्छ असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.साचणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी विनोद डवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाकडून शहरात महसूल विभागाच्या मालकीची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.शिवाजीनगर सरावली, सावटा, मानफोड पाडा आणि लोणपाडा परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागात ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कचरा टाकल्यानंतर त्यावर जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे असते. मात्र, ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने हे डंम्पिग ग्राऊंड त्वरीत बंद करावे , अशी मागणी होऊ लागली आहे. निवडून आलेले नवे चेहरे ही समस्या कशी हातळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.