शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

डहाणूतील दररोजचा १२ टन कचरा पालिकेसाठी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:34 IST

५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो.

शौकत शेखडहाणू : ५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो. मात्र डहाणूचा डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेले भाजपचे नगराध्यक्ष हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात याकडे रहिवासी डोळे लाऊन बसले आहेत.डहाणू नगरपरिषद स्थापन होऊन ३२ वर्षे होत आहेत. या कालावधीत बारा मुख्याधिकारी येथे येऊन गेले. मात्र, अद्याप डहाणू नगर परिषदेला शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत: च्या मालकीचे डिम्पंग ग्राऊंड निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे शहरात दररोज साठणारा १२ टन कचरा कुठे टाकावा, अशी गंभीर समस्या नगरपालिका प्रशासनापुढे उभी राहिली आहे.पर्यायान सध्यास्थीतीत लोणपाडा, सरावली येथे उघड्यावर कचरा डंप केला जात आहे. मात्र, त्यामुळे रहिवासी वस्ती त्रस्त झाल्याने नागरिकांकडून तक्र ारीचा सुर निघत आहे. कचºयामुळे दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे.डहाणूचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने डहाणू ग्रामपंचायतीचे १९८५ मध्ये पालिकेत रूपांतर केले. राज्यात शेती बागायती, चिकूची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर स्वच्छेच्याबाबतीत अस्वच्छ असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.साचणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी विनोद डवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाकडून शहरात महसूल विभागाच्या मालकीची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.शिवाजीनगर सरावली, सावटा, मानफोड पाडा आणि लोणपाडा परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागात ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कचरा टाकल्यानंतर त्यावर जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे असते. मात्र, ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने हे डंम्पिग ग्राऊंड त्वरीत बंद करावे , अशी मागणी होऊ लागली आहे. निवडून आलेले नवे चेहरे ही समस्या कशी हातळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.