शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जनगणनेचे काम : अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By admin | Updated: November 22, 2015 00:06 IST

पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे

पालघर : पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे अंगणवाडी सेविकामध्ये असंतोष पसरला असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन पुर्णवेळ कर्मचारी मानत नाही. हे कर्मचारी मानसेवी व अर्धवेळ कर्मचारी समजले जातात. अंगणवाडी कर्मचारी या सर्व महिला कर्मचारी असल्याने त्यांना आपले कुटूंब सांभाळून त्यांच्या योजनांचे अर्धवेळ काम करावे लागते. त्यांना दिलेल्या योजनेच्या कामामध्ये २० ते २२ अत्यावश्यक कामे रोजच्या रोज करावी लागत असून जिल्ह्णातील बालमृत्यू व अतिकुपोषीत बालकांच्या व त्यांच्या माता संदर्भात कसोशीने देखरेख ठेवावी लागते. अंगणवाडी सेवीकांना, कर्मचाऱ्यांना अंगणवाडीच्या कामाखेरीज योजनाबाह्ण कामे सांगण्यात येऊ नयेत असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभाग, दिल्ली यांनी अंगणवाडी सेविकावर योजनाबाह्ण कामे लादु नयेत असे आदेशही काढले आहेत. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयातुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे योजनाबाह्ण काम करण्याबाबत सक्ती व जबरदस्ती केली जात असल्याचे शासनाच्या या सक्तीचा व जबरदस्तीचा निषेध नोंदविण्यासाठी आज संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बुजपाल सिंह, कार्याध्यक्ष मंगला बरफ, राजेश सिंग, सुमन पिंपळे, नलीनी राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी भारताचे नागरीक म्हणून जनगणनेच्या कामाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी शिष्टमंडळाला केले. (वार्ताहर)