शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

स्मशानभूमीच मोजताहेत शेवटच्या घटका, भिंती तुटलेल्या, पत्रे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:32 IST

स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळया, वरून खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक परिस्थितीमधील भिंतींमुळे भविष्यात जीवघेणी दुर्घटना घडू शकते

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेने बांधलेली स्मशानभूमीच सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, पत्रे गायब आहे. अंत्यविधीसाठी जाणारा रस्ता सुद्धा व्यवस्थित नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाह मशिन्स आहेत, मात्र नियमित देखरेख न केल्याने धूळ खात पडलेली आहे. स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळया, वरून खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक परिस्थितीमधील भिंतींमुळे भविष्यात जीवघेणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की, अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर पडून कोणती दुर्घटना तर होणार नाही ना, अशी भीती वाटत असते. कित्येक वर्षांपासून या दिवाळांची डागडुजी न झाल्याने छताचे सिमेंट लावलेले प्लास्टर पडत आहे. त्याचबरोबर भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात तर मोठी कठीण परिस्थिती असते. रस्त्यावरील चिखल, तुटलेले व फुटलेले छप्पर आणि कुठे कुठे तर छप्परच नसल्याने भिजलेल्या लाकडांमुळे मृतदेह जाळण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, इलेक्ट्रिक शवदाह मशिनींमध्ये मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यावर त्यांच्या चिमणीमुळे आजूबाजूच्या परिसरात धूर आणि दुर्गंधी येत नाही. पण त्या मशीन आता बिघडल्याने रॉकेल किंवा इतर इंधन वापरून मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यावर धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाºया सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.धूळखात पडलेल्या इलेक्ट्रिक मशिन्सवसई-विरार महानगरपालिकेने २०१४ साली हद्दीमधील चार स्मशानभूमीत गॅस आणि इलेक्ट्रिक शवदाह योजना सुरू केली होती. यावर महानगरपालिकेने एक कोटी २० लाख रुपये खर्च केले होते, पण तीन वर्षातच ही योजना बारगळली आहे. सध्या तर महानगरपालिकेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षामुळे गॅस आणि इलेक्ट्रिक शवदाह मशिनी खराब होऊन भंगार अवस्थेत पडून आहेत. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाºया लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी तर दोन मृतदेह एकाच वेळी आल्याने त्यांना तासन्तास अंत्यविधीसाठी वाट पाहावी लागते.निवडणुकांनंतर पडतो मुद्याचा विसर३० लाख लोकसंख्येच्या वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी स्मशानभूमी ही मोठी समस्या आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी येणारे नागरिक महापालिकेला तक्रारी करत आहेत. उत्तम आणि सुव्यवस्था असलेली स्मशानभूमी आणि दफनभूमीची व्यवस्था करण्यात यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते मंडळी निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा प्रचारात घेतात आणि निवडून आल्यावर हा मुद्दा विसरूनही जातात.महापालिका क्षेत्रातील फुलपाडा, मनवेलपाडा, तुळिंज आणि समेळपाडामधील स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी २५-२५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच काम सुरू करण्यात येईल.- राजेंद्र लाड, सार्वजनिक बांधकामअभियंता, वसई-विरार महानगरपालिका.अंत्यसंस्कार करण्यासाठी गेल्यावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. महानगरपालिका लाखो रुपये खर्च केल्याचा दावा करते, पण अनेक वर्षांपासून स्मशानभूमींची परिस्थिती जशी होती तशीच आहे.- मयूर सकपाळ, स्थानिक रहिवासीवसई-विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये नागरिक जिवंत काय, मयत काय, फक्त त्यांना लुटण्याचे काम केले जात आहे. स्मशानभूमीची खराब परिस्थिती चिंतेचा विषय बनला आहे.- मनीषा वाडकर, संतप्त महिला

टॅग्स :Vasai Virarवसई विरार