शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाड्यातील आदिवासींनी साकारली श्रमदानातून स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:35 IST

गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली

वसई : गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली व इतरांपुढे नवा आदर्श निर्माण केला.नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात कोलबांव, इंद्राणी, वराला, चिचपाडा, दिव्हादपाडा असे आदिवासी पाडे असून त्यांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी बंदरवाडी येथे सरकारी खाजण जमिनीवर ब्रिटीशकालापासून स्मशानभूमी आहे. आर्थिक हलाखीमुळे पूर्वी येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफन केले जात होते. लाकडे उपलब्ध होऊ लागल्यानंतर दगडांचा थर रचून त्यावर चिता रचली जात होती. १९८२ साली गास ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच स्टँड उभारला. तो मोडल्यानंतर दुसरा उभारला तो ही चोरीला गेल्यावर तिसरा बसविण्यात आला होता. वसई विरार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर तो ही गंजून भंगार झाला होता. नवा स्टँड बसवण्यासाठी पाड्यातील लोकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सभापती पंकज चोरघे यांनी तो बसवून दिला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरातच १९ मार्चला महापालिकेने तो काढून नेला. त्यामुळे ब्रिटीशांच्या काळात होत होते तसे दगडावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची पाळी पुन्हा एकदा येथील स्थानिकांवर आली होती.स्टँड काढून नेल्यानंतर आदिवासी पाड्यातील माजी सरपंच चंद्रकांत वळवी, सालू अल्मेडा, पोलीस पाटील सोन्या वळवी यांनी महापौर प्रविणा ठाकूर यांची १७ जुलैला भेट घेतली होती. स्टँड नसल्यामुळे भर पावसात चिखलात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आणि नगर अभियंत्यांना तात्काळ तो स्टँड बसवण्याचे आदेश दिले होते. असाच आदेश महापौरांनी या दोन्ही अधिकाºयांना १ आॅगस्टला पुन्हा एकदा दिला होता. पण, तो बसविला गेला नाही.१८ आॅगस्टला आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडण्यात आली होती. त्यांनीही महापालिका अधिकाºयांना तात्काळ तो बसवण्याचे आदेश दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत तो बसविण्यात आला नाही. उलट त्याचा आणि स्मशानभूमीचा नाद सोडा त्याऐवजी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली जाईल. पार्थीव अ‍ॅम्बुलन्समधून भुईगावाच्या स्मशानभूमीत न्या आणि अंत्यसंस्कार करा, असा सल्ला अधिकारी देत असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून हा स्टँड बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरटी दोनशे रुपये प्रमाणे १८ हजार रुपये जमा झाले. त्यातून हे काम झाले.