शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

पाड्यातील आदिवासींनी साकारली श्रमदानातून स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:35 IST

गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली

वसई : गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली व इतरांपुढे नवा आदर्श निर्माण केला.नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात कोलबांव, इंद्राणी, वराला, चिचपाडा, दिव्हादपाडा असे आदिवासी पाडे असून त्यांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी बंदरवाडी येथे सरकारी खाजण जमिनीवर ब्रिटीशकालापासून स्मशानभूमी आहे. आर्थिक हलाखीमुळे पूर्वी येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफन केले जात होते. लाकडे उपलब्ध होऊ लागल्यानंतर दगडांचा थर रचून त्यावर चिता रचली जात होती. १९८२ साली गास ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच स्टँड उभारला. तो मोडल्यानंतर दुसरा उभारला तो ही चोरीला गेल्यावर तिसरा बसविण्यात आला होता. वसई विरार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर तो ही गंजून भंगार झाला होता. नवा स्टँड बसवण्यासाठी पाड्यातील लोकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सभापती पंकज चोरघे यांनी तो बसवून दिला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरातच १९ मार्चला महापालिकेने तो काढून नेला. त्यामुळे ब्रिटीशांच्या काळात होत होते तसे दगडावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची पाळी पुन्हा एकदा येथील स्थानिकांवर आली होती.स्टँड काढून नेल्यानंतर आदिवासी पाड्यातील माजी सरपंच चंद्रकांत वळवी, सालू अल्मेडा, पोलीस पाटील सोन्या वळवी यांनी महापौर प्रविणा ठाकूर यांची १७ जुलैला भेट घेतली होती. स्टँड नसल्यामुळे भर पावसात चिखलात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आणि नगर अभियंत्यांना तात्काळ तो स्टँड बसवण्याचे आदेश दिले होते. असाच आदेश महापौरांनी या दोन्ही अधिकाºयांना १ आॅगस्टला पुन्हा एकदा दिला होता. पण, तो बसविला गेला नाही.१८ आॅगस्टला आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडण्यात आली होती. त्यांनीही महापालिका अधिकाºयांना तात्काळ तो बसवण्याचे आदेश दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत तो बसविण्यात आला नाही. उलट त्याचा आणि स्मशानभूमीचा नाद सोडा त्याऐवजी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली जाईल. पार्थीव अ‍ॅम्बुलन्समधून भुईगावाच्या स्मशानभूमीत न्या आणि अंत्यसंस्कार करा, असा सल्ला अधिकारी देत असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून हा स्टँड बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरटी दोनशे रुपये प्रमाणे १८ हजार रुपये जमा झाले. त्यातून हे काम झाले.