शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यातील आदिवासींनी साकारली श्रमदानातून स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:35 IST

गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली

वसई : गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली व इतरांपुढे नवा आदर्श निर्माण केला.नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात कोलबांव, इंद्राणी, वराला, चिचपाडा, दिव्हादपाडा असे आदिवासी पाडे असून त्यांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी बंदरवाडी येथे सरकारी खाजण जमिनीवर ब्रिटीशकालापासून स्मशानभूमी आहे. आर्थिक हलाखीमुळे पूर्वी येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफन केले जात होते. लाकडे उपलब्ध होऊ लागल्यानंतर दगडांचा थर रचून त्यावर चिता रचली जात होती. १९८२ साली गास ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच स्टँड उभारला. तो मोडल्यानंतर दुसरा उभारला तो ही चोरीला गेल्यावर तिसरा बसविण्यात आला होता. वसई विरार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर तो ही गंजून भंगार झाला होता. नवा स्टँड बसवण्यासाठी पाड्यातील लोकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सभापती पंकज चोरघे यांनी तो बसवून दिला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरातच १९ मार्चला महापालिकेने तो काढून नेला. त्यामुळे ब्रिटीशांच्या काळात होत होते तसे दगडावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची पाळी पुन्हा एकदा येथील स्थानिकांवर आली होती.स्टँड काढून नेल्यानंतर आदिवासी पाड्यातील माजी सरपंच चंद्रकांत वळवी, सालू अल्मेडा, पोलीस पाटील सोन्या वळवी यांनी महापौर प्रविणा ठाकूर यांची १७ जुलैला भेट घेतली होती. स्टँड नसल्यामुळे भर पावसात चिखलात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आणि नगर अभियंत्यांना तात्काळ तो स्टँड बसवण्याचे आदेश दिले होते. असाच आदेश महापौरांनी या दोन्ही अधिकाºयांना १ आॅगस्टला पुन्हा एकदा दिला होता. पण, तो बसविला गेला नाही.१८ आॅगस्टला आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडण्यात आली होती. त्यांनीही महापालिका अधिकाºयांना तात्काळ तो बसवण्याचे आदेश दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत तो बसविण्यात आला नाही. उलट त्याचा आणि स्मशानभूमीचा नाद सोडा त्याऐवजी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली जाईल. पार्थीव अ‍ॅम्बुलन्समधून भुईगावाच्या स्मशानभूमीत न्या आणि अंत्यसंस्कार करा, असा सल्ला अधिकारी देत असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून हा स्टँड बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरटी दोनशे रुपये प्रमाणे १८ हजार रुपये जमा झाले. त्यातून हे काम झाले.