शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी 

By धीरज परब | Updated: May 17, 2024 18:16 IST

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मीरारोड - निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदारांनी मतदान केंद्रावर येताना सोबत मोबाईल आणू नये व आयोगाच्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मतदान केंद्रात तसेच मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी छायाचित्र काढण्यास बंदी आहे . त्याच प्रमाणे मोबाईल नेण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेल्यास आतील छायाचित्र काढण्याची वा छायाचित्रण करण्याची भीती आयोगाला वाटते. या शिवाय मोबाईल च्या गैरवापरा मुळे मतदान प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी कारणे मोबाईल बंदी मागे दिली जात आहेत. 

वास्तविक मोबाईल हा दैनंदिन वापरातील महत्वाचा भाग बनला आहे . शिवाय हल्ली मतदान पत्रिका , मतदान केंद्र आदींची माहिती सुद्धा मोबाईलवर दिली जाते. अनेक मतदार तर कामा निमित्त जाताना मतदान करून जातात. मग त्यांनी त्यांचे सामान आणि मोबाईल ठेवायचे तरी कुठे? असे प्रश्न केले जातात. मतदानासाठी बाहेर पडताना एक तर घरीच मोबाईल ठेवावा लागणार आह. कारण वाहन वगैरे सोबत असले तरी त्यात मोबाईल ठेवणे सुद्धा चोरीला जाण्याची भीती असते . आपल्या परिचितांना शोधणे वा आवश्यकता असल्यास संपर्क साधण्यास मोबाईल सोबत असणे बहुतांशी लोकांना गरजेचे वाटते. 

परंतु निवडणूक आयोगानेच मोबाईल आणण्यास मनाई केलेली असल्याने त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्तालयातील पोलीस सूत्रांनी सांगितले . मतदानासाठी आलेल्या मतदाराचा मोबाईल ठेवण्याची पर्यायी व्यवस्था करणे देखील अशक्य व अवघड असल्याचे सांगितले जाते . मोबाईल सोबत नसल्याने बहुतांश मतदारांची मात्र अडचण तसेच गैरसोय होणार आहे. 

मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी देखील भाईंदर पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत , मतदारांनी मतदान केंद्रांवर मोबाईल  सोबत आणू नये असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड