शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी 

By धीरज परब | Updated: May 17, 2024 18:16 IST

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मीरारोड - निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदारांनी मतदान केंद्रावर येताना सोबत मोबाईल आणू नये व आयोगाच्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मतदान केंद्रात तसेच मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी छायाचित्र काढण्यास बंदी आहे . त्याच प्रमाणे मोबाईल नेण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेल्यास आतील छायाचित्र काढण्याची वा छायाचित्रण करण्याची भीती आयोगाला वाटते. या शिवाय मोबाईल च्या गैरवापरा मुळे मतदान प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी कारणे मोबाईल बंदी मागे दिली जात आहेत. 

वास्तविक मोबाईल हा दैनंदिन वापरातील महत्वाचा भाग बनला आहे . शिवाय हल्ली मतदान पत्रिका , मतदान केंद्र आदींची माहिती सुद्धा मोबाईलवर दिली जाते. अनेक मतदार तर कामा निमित्त जाताना मतदान करून जातात. मग त्यांनी त्यांचे सामान आणि मोबाईल ठेवायचे तरी कुठे? असे प्रश्न केले जातात. मतदानासाठी बाहेर पडताना एक तर घरीच मोबाईल ठेवावा लागणार आह. कारण वाहन वगैरे सोबत असले तरी त्यात मोबाईल ठेवणे सुद्धा चोरीला जाण्याची भीती असते . आपल्या परिचितांना शोधणे वा आवश्यकता असल्यास संपर्क साधण्यास मोबाईल सोबत असणे बहुतांशी लोकांना गरजेचे वाटते. 

परंतु निवडणूक आयोगानेच मोबाईल आणण्यास मनाई केलेली असल्याने त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्तालयातील पोलीस सूत्रांनी सांगितले . मतदानासाठी आलेल्या मतदाराचा मोबाईल ठेवण्याची पर्यायी व्यवस्था करणे देखील अशक्य व अवघड असल्याचे सांगितले जाते . मोबाईल सोबत नसल्याने बहुतांश मतदारांची मात्र अडचण तसेच गैरसोय होणार आहे. 

मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी देखील भाईंदर पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत , मतदारांनी मतदान केंद्रांवर मोबाईल  सोबत आणू नये असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड