शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी 

By धीरज परब | Updated: May 17, 2024 18:16 IST

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मीरारोड - निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदारांनी मतदान केंद्रावर येताना सोबत मोबाईल आणू नये व आयोगाच्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मतदान केंद्रात तसेच मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी छायाचित्र काढण्यास बंदी आहे . त्याच प्रमाणे मोबाईल नेण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेल्यास आतील छायाचित्र काढण्याची वा छायाचित्रण करण्याची भीती आयोगाला वाटते. या शिवाय मोबाईल च्या गैरवापरा मुळे मतदान प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी कारणे मोबाईल बंदी मागे दिली जात आहेत. 

वास्तविक मोबाईल हा दैनंदिन वापरातील महत्वाचा भाग बनला आहे . शिवाय हल्ली मतदान पत्रिका , मतदान केंद्र आदींची माहिती सुद्धा मोबाईलवर दिली जाते. अनेक मतदार तर कामा निमित्त जाताना मतदान करून जातात. मग त्यांनी त्यांचे सामान आणि मोबाईल ठेवायचे तरी कुठे? असे प्रश्न केले जातात. मतदानासाठी बाहेर पडताना एक तर घरीच मोबाईल ठेवावा लागणार आह. कारण वाहन वगैरे सोबत असले तरी त्यात मोबाईल ठेवणे सुद्धा चोरीला जाण्याची भीती असते . आपल्या परिचितांना शोधणे वा आवश्यकता असल्यास संपर्क साधण्यास मोबाईल सोबत असणे बहुतांशी लोकांना गरजेचे वाटते. 

परंतु निवडणूक आयोगानेच मोबाईल आणण्यास मनाई केलेली असल्याने त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्तालयातील पोलीस सूत्रांनी सांगितले . मतदानासाठी आलेल्या मतदाराचा मोबाईल ठेवण्याची पर्यायी व्यवस्था करणे देखील अशक्य व अवघड असल्याचे सांगितले जाते . मोबाईल सोबत नसल्याने बहुतांश मतदारांची मात्र अडचण तसेच गैरसोय होणार आहे. 

मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी देखील भाईंदर पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत , मतदारांनी मतदान केंद्रांवर मोबाईल  सोबत आणू नये असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड