शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या आठवडाबाजार स्थलांतराला मनाई

By admin | Updated: February 2, 2016 01:40 IST

भार्इंदर येथील आठवडाबाजार नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतर करण्याच्या पालिकेच्या इराद्याला स्थानिक पोलिसांनी मनाई केली.

भार्इंदर : भार्इंदर येथील आठवडाबाजार नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतर करण्याच्या पालिकेच्या इराद्याला स्थानिक पोलिसांनी मनाई केली. येथील मार्गावरून उत्तनच्या ज्युडीशियल अकादमी तसेच केशवसृष्टी येथे ये-जा करणाऱ्या व्हीआयपींना त्याचा अडसर तसेच धोका उद्भवण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पालिकेकडून बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून होऊ लागल्यानंतर प्रशासनाने त्याला नुकतीच सुरुवात केली आहे. ती सुरू झाल्यानंतर प्रशासनाने मीरा रोड येथील सोमवारचा आठवडा बाजारही बंद करण्याची कार्यवाही सुरू करून भार्इंदर येथील रविवारचा आठवडाबाजार परिसरातीलच नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला या बाजारातील भाजी-फळे व खाद्यपदार्थ विक्रेत्यांखेरीज इतर विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर केल्याने त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात केली आहे. परंतु, यातील स्थलांतराच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणे अपघाताची आहेत. याच रस्त्यावरून दिवाणी ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उत्तन-गोराई मार्गावर असलेल्या महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल अ‍ॅकॅडमीत सतत येत असतात. उत्तनमध्येच असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टीत भाजपा मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही सतत रेलचेल असते. यात सध्या वाढ झाली असून रविवारी मात्र व्हीआयपींच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. शिवाय येथील भाटेबंदर, पाली बीचवर रविवारच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची वाहनेसुद्धा याच रस्त्यावरून धावत असल्याने रविवारच्या दिवशी तेथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अगोदरच येथील व्हीआयपींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना या रस्त्यावर विशेष बंदोबस्त ठेवावा लागत असताना रविवारचा आठवडाबाजार येथे स्थलांतरित केल्यास तेथे गर्दी वाढून व्हीआयपींना अडसर तसेच त्यांना धोका निर्माण होण्याचा संभव असल्याचे भार्इंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सांगितले. हे स्थलांतर रोखण्याबाबत आयुक्त तसेच महापौरांना विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)