शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जातवैधता प्रमाणपत्र ‘गले का काटा’

By admin | Updated: March 30, 2016 01:13 IST

आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात सुमारे साडेतीनशेडून अधिक ग्राम पंचायतीच्या निवडणूका १७ एप्रिल रोजी होत आहेत. या निवडणूकीसाठी २९ मार्च

वाडा : आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात सुमारे साडेतीनशेडून अधिक ग्राम पंचायतीच्या निवडणूका १७ एप्रिल रोजी होत आहेत. या निवडणूकीसाठी २९ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. मात्र अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्ग यासाठी आरक्षित असलेल्या जागांवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला जातपडताळणी समितीने दिलेले जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे केल्याने या दाखल्या अभावी अनेक इच्छुक छाननीमध्ये अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करावी व ते सादर करण्यासाठी उमेदवारांना मुदत द्यावी अशी विनंती वाडा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पटारे यांनी राज्य निवडणूक आयोग व पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गीय आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत राज्य निवडणुक आयोगाने दोन परिपत्रके जारी केली असून २ मार्च रोजीच्या परिपत्रकामध्ये ज्या उमेदवारांच्या अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यानी जात पडताळणी समितीकडे सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोचपावती जोडावी असे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर) परिपत्रकामुळे गोंधळ : ११ मार्चच्या राज्य निवडणूक आयोगाच्याच दुसऱ्या परिपत्रकामध्ये उमेदवाराने उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या या दोन वेगवेळ्या परिपत्रकामुळे मागास वर्गीय जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारामध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.