शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत बविआची भूमिका मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:32 IST

उपप्रदेशाच्या विकासाला गती; शिक्षण, नोकऱ्या अन् विकासाच्या प्रक्रियेला गती

पालघर : वर्ष २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या संपूर्ण उपप्रदेशाला महत्व आले व तमाम राजकीय पक्षांनी आपले लक्ष या जिल्ह्यावर केंद्रित केले. २००९ मध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी बाजी मारली व उपप्रदेशाच्या विकासाला चांगलीच गती मिळाली. जाधव यांनी आपल्या कार्यकालात अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावली. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाचा समावेश होता. अनेक प्रश्न व समस्या मार्गी लावण्यात जाधव यशस्वी ठरले व जिल्हा विकासाच्या वाटेवर मार्गस्थ झाला. अनेक वर्षे सुटू न शकलेले प्रश्न सुटल्यामुळे जिल्हावासीयांनाही दिलासा मिळाला.या भागातील तरु णांना माहिती व तंत्रज्ञान या महत्वाच्या क्षेत्रात दर्जेदार शिक्षण व कालांतराने रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आ. क्षितिज ठाकूर यांनी वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. तसेच त्याविषयीचा सर्व्हे एका अमेरिकन कंपनीकडून करून घेतला. त्याचे दृश्य परिणाम येणाºया काळात जिल्हावासीयांना नक्कीच पाहावयास मिळतील. माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरु णांना रोजगार, ही संकल्पना राबवण्यासाठी आ. ठाकूर यांनी राज्य शासनाला वेळोवेळी मौलिक सूचना केल्या.बांधकाम क्षेत्रातही बहुजन विकास आघाडीने मोलाची कामिगरी बजावली. सर्वसामान्यजनांच्या खिशाला परवडतील अशी बांधकामे करण्याकडे त्यांचा कल असून, कॉमन मॅन हा भरडला जाता कामा नये, याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली. त्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. विविध प्रांतातील नोकरदार मंडळी आता येथे स्थिरावली आहेत. शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आली. त्यामुळे कला व क्र ीडा या दोन्ही क्षेत्रालाही चांगलेच महत्व आले आहे. सन 1990 पासून वसई तालुक्यात भव्य दिव्य असा कला व क्र ीडा महोत्सव आयोजित करण्यात येत असून या महोत्सवात सुमारे ५० हजार स्पर्धक सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला-क्र ीडा गुणांना वाव मिळावा,यासाठी हा सुरू झालेला महोत्सव आता उत्तरोत्तर वाढत आहे. विवा महाविद्यालयाने शेतीविषयक विविध चाचण्या पार पाडल्या. शेतकºयाना शीतगृहे व बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वसई-विरार शहर मनपा प्रयत्नशील असून शेतीसाठी दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करत असते. जिल्ह्यात उद्योगधंदे यावेत, गावपातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी बहुजन विकास आघाडीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हे करत असताना प्रदूषण करणारे विनाशकारी प्रकल्प येऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली.विरार येथे टर्मिनसची मागणीमहिलांसाठी स्वच्छतागृहे, रेल्वे स्थानकावर आरोग्य केंद्रे, सरकते जिने, महिला विशेष लोकलच्या संख्येत वाढ, स्वयंचलीत दरवाजे असलेले रेक्स इ. मागण्याचा पाठपुरावा बहुजन विकास आघाडीतर्फे करण्यात येत आहे. विरार येथे रेल्वेची अनेक एकर जमिनी आहेत, त्यामुळे येथे टर्मिनस उभे करणे सहज शक्य आहे. मुंबईतील रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी येथे टर्मिनस उभारणे,अत्यंत गरजेचे आहे. ते झाल्यास लांब पल्याच्या गाड्या येथे सोडणे शक्य होऊ शकते.५२ कोटी रु .चा निधी मंजूर : चर्चगेट- डहाणू उपनगरीय सेवेचे जिल्हावासीयांचे स्वप्न तत्कालीन खासदार बळीराम जाधव यांनी आपल्या अथक प्रयत्नाने प्रत्यक्षात उतरवले. तसेच डहाणू-नाशिक रेल्वे हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी या मार्गाचे सर्व्हेेक्षण करण्यासाठी केंद्राकडून ५२ कोटी रु .चा निधी मंजूर करून घेतला. येणाºया काळात हा प्रकल्पदेखील मार्गी लागण्याची शक्यता आहे.