शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील विजेचे खांब जीवघेणे; जबाबदारी कुणाची? हेच निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:07 IST

अचोळेतील भूमीगत वाहिन्यांसाठी ७९ कोटी

विरार : वसई विरार शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना याठिकाणी सर्वत्र विकास पाहायला मिळत आहे. हल्लीच रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने रस्त्यावर विजेचे खांब असणे साहजिक आहे. परंतु हे विजेचे खांब असेच रस्त्यावर पडलेले असल्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहेच परंतु याच सोबत अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.

वसई विरार शहरात तसेच ग्रामीण भागात धोकादायक रोहित्रे आहेत. तसेच काही ठिकाणी वीज तारा देखील धोकादायक झाल्या असून रोहित्रे देखील उघडी आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आताच कामे सुरू करून पूर्ण केल्यास पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा होऊ शकतो.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वितरण व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करावी त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे उपाय करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्या आधी सर्व काम पूर्ण व्हावे यासाठी विरार विभागातील दिवाबत्ती, वीजवितरण विषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकी घेण्यात आल्या त्यात अनेक सूचना नगरसेवकांनी केल्या. यात काही विजेचे खांब खालून सडले असून वायरींचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने ठिणग्या उडतात. या तक्रारींचा समावेश होता. ज्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्याठिकाणची रोहित्रे व खांब स्थलांतरित करण्यात आले आहेत. रस्त्यातील विजेचे खांब, रोहित्रे हटविण्याचे काम महापालिका अथवा महावितरण यापैकी कुणी करायचे हे अद्याप ठरलेले नाही.

वसई ते पापडी, जूचंद्र, नालासोपारा येथील आचोळे या भागात भूमिगत केबल टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ७९ कोटींचे अंदाजपत्रक आहे. हे काम मंजूर असून जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -अरूण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण