शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

वसईतील विजेचे खांब जीवघेणे; जबाबदारी कुणाची? हेच निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:07 IST

अचोळेतील भूमीगत वाहिन्यांसाठी ७९ कोटी

विरार : वसई विरार शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना याठिकाणी सर्वत्र विकास पाहायला मिळत आहे. हल्लीच रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने रस्त्यावर विजेचे खांब असणे साहजिक आहे. परंतु हे विजेचे खांब असेच रस्त्यावर पडलेले असल्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहेच परंतु याच सोबत अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.

वसई विरार शहरात तसेच ग्रामीण भागात धोकादायक रोहित्रे आहेत. तसेच काही ठिकाणी वीज तारा देखील धोकादायक झाल्या असून रोहित्रे देखील उघडी आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आताच कामे सुरू करून पूर्ण केल्यास पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा होऊ शकतो.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वितरण व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करावी त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे उपाय करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्या आधी सर्व काम पूर्ण व्हावे यासाठी विरार विभागातील दिवाबत्ती, वीजवितरण विषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकी घेण्यात आल्या त्यात अनेक सूचना नगरसेवकांनी केल्या. यात काही विजेचे खांब खालून सडले असून वायरींचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने ठिणग्या उडतात. या तक्रारींचा समावेश होता. ज्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्याठिकाणची रोहित्रे व खांब स्थलांतरित करण्यात आले आहेत. रस्त्यातील विजेचे खांब, रोहित्रे हटविण्याचे काम महापालिका अथवा महावितरण यापैकी कुणी करायचे हे अद्याप ठरलेले नाही.

वसई ते पापडी, जूचंद्र, नालासोपारा येथील आचोळे या भागात भूमिगत केबल टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ७९ कोटींचे अंदाजपत्रक आहे. हे काम मंजूर असून जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -अरूण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण