शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

वसईतील विजेचे खांब जीवघेणे; जबाबदारी कुणाची? हेच निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:07 IST

अचोळेतील भूमीगत वाहिन्यांसाठी ७९ कोटी

विरार : वसई विरार शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना याठिकाणी सर्वत्र विकास पाहायला मिळत आहे. हल्लीच रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने रस्त्यावर विजेचे खांब असणे साहजिक आहे. परंतु हे विजेचे खांब असेच रस्त्यावर पडलेले असल्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहेच परंतु याच सोबत अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.

वसई विरार शहरात तसेच ग्रामीण भागात धोकादायक रोहित्रे आहेत. तसेच काही ठिकाणी वीज तारा देखील धोकादायक झाल्या असून रोहित्रे देखील उघडी आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आताच कामे सुरू करून पूर्ण केल्यास पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा होऊ शकतो.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वितरण व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करावी त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे उपाय करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्या आधी सर्व काम पूर्ण व्हावे यासाठी विरार विभागातील दिवाबत्ती, वीजवितरण विषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकी घेण्यात आल्या त्यात अनेक सूचना नगरसेवकांनी केल्या. यात काही विजेचे खांब खालून सडले असून वायरींचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने ठिणग्या उडतात. या तक्रारींचा समावेश होता. ज्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्याठिकाणची रोहित्रे व खांब स्थलांतरित करण्यात आले आहेत. रस्त्यातील विजेचे खांब, रोहित्रे हटविण्याचे काम महापालिका अथवा महावितरण यापैकी कुणी करायचे हे अद्याप ठरलेले नाही.

वसई ते पापडी, जूचंद्र, नालासोपारा येथील आचोळे या भागात भूमिगत केबल टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ७९ कोटींचे अंदाजपत्रक आहे. हे काम मंजूर असून जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -अरूण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण