शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

परवानगी न घेता बांधकाम केलेल्या इमारतींना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:34 IST

वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाची स्थापना झाल्यापासून याठिकाणी अधिकृत बांधकामांबरोबरच अनधिकृत बांधकामांचा जोरही वाढला आहे.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाची स्थापना झाल्यापासून याठिकाणी अधिकृत बांधकामांबरोबरच अनधिकृत बांधकामांचा जोरही वाढला आहे. मध्यंतरी पालिकेने नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून अनधिकृत बांधकामं वैध करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. त्याअनुषंगाने काम करताना आता पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना पालिकेने शास्ती आकारण्यास सुरूवात केली आहे.कोणतेही रहीवास बांधकाम करण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेकडून परवानगी घेणे अनिवार्य असते. तसेच संबंधीत बांधकामाचा पाया रचल्यानंतर त्या बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. संपूर्ण बांधकाम तयार झाले की, मग पालिकेकडून त्याला भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. एकदा भोगवटा प्रमाणपत्र मिळाले की, इमारत अधिकृत असल्याचा शिक्का त्यावर बसतो. अशा इमारतीला पालिकेकडून सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. बांधकाम अधिकृत ठरवण्याची पालिकेची सदर नियमावली असली तरी पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेता नागरिकांना अंधारात ठेवून त्यांना तयार बांधकामं विकली जातात. काही विकासक आर्थिक फायद्यासाठी बेकायदा बांधकामं बोगस कागदपत्रांचा आधार घेत नागरिकांना विकतात. त्यामुळे पालिकेचा महसूल तर बुडताचे शिवाय नागरिकांचेही नुकसान व फसवणूक होते. याबाबत महापालिकेने आता ठोस भूमिका घेत ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या सर्व इमारती अनधिकृत ठरवल्या आहेत. त्यामुळे संबंधीत इमारतींना शास्ती लावण्यास पालिकेने सुरूवात केली आहे.ओसी नसलेल्या इमारती दहा ते पंधरा वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर शास्ती आकारत असल्याने या इमारतींमधील रहिवाशी धास्तावले आहेत. मुळात ज्या बांधकाम व्यवसायिकांनी या इमारती बांधल्या आणि भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. त्यांच्यावर कारवाई करायला हवी, रहिवाशांना नाहक भुर्दंड का? असा सवाल रहिवशांकडून विचारला जात आहे. फसवणूक झालेल्या या नागरिकांनी शास्ती आकाण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.सर्वसामान्यांची गोचीया नव्या नियमामुळे बहुतांश इमारतीतील नागरिकांना आता नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.शहरात बऱ्याचशा अशा इमारती आहेत ज्यांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्या अनधिकृत ठरतात. अशा बांधकामांना शास्ती आकारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार