शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

बहुजन विकास आघाडीचा शहरी व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:25 IST

प्रत्येक घरात वीज दिल्याचा दावा करणाऱ्यांनी : मोखाडा, तलासरीत सर्वेक्षण करावे

पालघर : बहुजन विकास आघाडीचे नेते आ.हितेंद्र ठाकूर व उमेदवार बळीराम जाधव या दोघांनी बुधवारी जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला. बळीराम जाधव यांनी मोखाडा, जव्हार, खोडाळा व विक्र मगड या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे ते भारावून गेले. यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, हे सरकार गोरगरीबांचे नसून मूठभर उद्योगपतीसाठी राबणारे सरकार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असतांना, राज्य सरकार मात्र आपल्याच मस्तीत आहे. ग्रामीण भागात हजारो आदिवासी मुले कुपोषणांमुळे मरणाच्या दारात आहेत, परंतु सरकारला त्याची चाड नाही. गुरांना चारा नाही, आदिवासी शेतमजुरांच्या हाताला काम नाही, मनरेगा योजनेंतर्गत असलेली कामे बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ कि.मी. पायपीट करावी लागत आहे, अशी स्थिती असताना सरकार मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.दुसरीकडे आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई,नालासोपारा व वसई गावात झालेल्या चौकसभेत सरकारच्या गैरकारभारावर चौफेर टीका केली.ते म्हणाले, अच्छे दिन राहिले दूर, पूर्वी होते ते दिवस राहिले म्हणजे आपण खूप काही मिळवल्यासारखे होईल, काँग्रेसच्या कारकिर्दीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलून स्वत:च्या नावावर खपवणारे हे सरकार आहे.३५० चा सिलिंडर ८०० ला हे अच्छे दिन म्हणायचे का?ही मंडळी मते मागायला आली की त्यांना जाब विचारा.गॅस सिलिंडर ३५० रु. होता तो आता ८०० रु . झाला. याला आपण अच्छे दिन म्हणायचे का ?देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली, असा दावा करणार्या मोदी सरकारने मोखाडा भागात अंधारात चाचपडणाºया गावांचे सर्व्हेक्षण करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर