शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; मनपाची तोडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 19:53 IST

स्थानिकांचे अश्रू अनावर, या ४१ इमारतींपैकी ७ इमारतींवर गुरुवारपासून कारवाईला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारतींवर मनपा प्रशासनाकडून सकाळी ९ वाजल्यापासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. या इमारतीत १० हजार रहिवाशांचे १२०० कुटुंब गेल्या १४ वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते. तोडक कारवाईमुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. येथील काही नागरिकांनी कारवाई होणार म्हणून सदनिका रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या होत्या. घरे सोडताना अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांचा संसार अक्षरश: रस्त्यावर आला आहे, अनेकांनी राहण्यासाठी घरे नाहीत. आता आम्ही कुठे जाणार, असे सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. सकाळी ९ वाजल्यापासून कारवाईसाठी मनपा, पोलीस, बांधकाम विभागांच्या पथक जेसीबीसह याठिकाणी कारवाई करत आहे.

मनपाच्या प्रभाग समिती 'डी' मौजे आचोळे सर्वे नं. २२ ते ३२ व ८३ मधील अग्रवाल नगरी येथे डंपिग ग्राऊंड व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रसाठी भूखंड आरक्षित आहे. २००६ मध्ये ही जमीन बविआचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी ही जमीन बळकावून, २०१० ते २०१२ या कालावधीत चार मजल्यांच्या ४१ अनधिकृत इमारती बांधून, बोगस कागदपत्राच्या आधारे तेथील घर रहिवाशांना विकले होते. काही वर्षांपूर्वी अजय शर्माने त्याच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार मनपाने केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर जमीन मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सीताराम आणि अरुण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

लोकांचे अश्रू अनावर

या ४१ इमारतींपैकी ७ इमारतींवर गुरुवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसह त्यांचे सामान घराबाहेर काढून कारवाईला सुरुवात केल्यावर लहान मुलांपासून मोठ्या माणसांचे अश्रू अनावर झाले आहे.

असा होता तगडा बंदोबस्त

या अनधिकृत इमारतींच्या कारवाईवेळी १ पोलीस उपायुक्त, १ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ पोलीस निरीक्षक, २५ पोलीस अधिकारी, ११२ पुरुष पोलीस अंमलदार, ४२ महिला पोलीस अंमलदार, २० मसुब कर्मचारी, आरसीपी आणि एसआरपीएफचे ४ प्लाटून असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

डंपिंग ग्राऊंड आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवर न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून अनधिकृत ४१ इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. आता सध्या ७ इमारतींवर कारवाई केली जात आहे. इमारतीमधील रहिवाशी सुप्रीम कोर्टात पण गेली होती पण त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. पुनर्वसन बाबतीत मनपाची कोणतीही पॉलिसी नाही. याबाबत राज्य सरकारला पुनर्वसन बाबतीत पत्रव्यवहार केला आहे. हे अनधिकृत बांधकामे असल्याने ही कारवाई सुरू केली आहे. - अनिलकुमार पवार (आयुक्त, वसई विरार मनपा)

टॅग्स :nalasopara-acनालासोपारा